शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाणीपातळीत घट; उजनी धरणाचा मायनसमध्ये प्रवेश...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 11:27 IST

सोलापूरकरांची चिंता वाढली; पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक

ठळक मुद्देगेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीतील पाणीसाठा वजा ३७.९४ टक्के होताउजनी धरणाकडे सोलापूर जिल्ह्यासह पुणे, नगर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्षजून महिन्यात पाऊस पडेलच याची खात्री नसल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक

भीमानगर : चालूवर्षी उजनी धरणात १११ टक्के पाणीसाठा म्हणजेच १२३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असला तरी उजनी धरणाने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक महिना उशिराने मायनसमध्ये प्रवेश केला आहे.

उजनी पाणलोट क्षेत्रातील म्हणजेच भीमा खोºयातील धरण परिसरात पडलेल्या पावसामुळे यंदा उजनी धरण १०० टक्क्यांपेक्षा जास्त भरले; मात्र बुधवारी सकाळी ९ वाजता उजनी धरणाने मायनसमध्ये प्रवेश केला आहे. अजूनही मे महिना निम्मा तर जून महिन्यात पाऊस पडेलच याची खात्री नसल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे़ उजनी धरण १०० टक्के भरले त्यावेळी पाणीसाठा ११७ टीएमसी होतो. 

तसेच धरण १११ टक्के भरते त्यावेळी पाणीसाठा १२३ टीएमसी होतो. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीतील पाणीसाठा वजा ३७.९४ टक्के होता.हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आल्याने सध्या उजनी धरणाकडे सोलापूर जिल्ह्यासह पुणे, नगर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्ष असते. आज  विकासाची गती दिसून येते त्या मागील मूळ कारण आहे ते म्हणजे उजनी धरण आहे. या धरणामुळे सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादनात आघाडी घेतली पयार्याने सर्वात जास्त ऊस कारखाने याच सोलापूर जिल्ह्यात उभे राहिले. कारखाने जास्त उभे राहिल्याने दळणवळणात क्रांती झाली. अनेक वेगवेगळ्या शेतीक्षेत्राशी निघडीत उद्योग व्यवसाय निर्माण झाले.

उजनीची सद्यस्थिती

  • एकूण पाणी पातळी ४९०.९७५ मीटर
  • एकूण पाणी साठा १७९१.९८ दलघमी
  • उपयुक्त पाणी साठा वजा १०.८३ दलघमी
  • टक्केवारी वजा ०.७१
  • एकूण टीएमसी ६३.२८
  • उपयुक्त टीएमसी वजा ०. ३८
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपात