शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वंचितचा इशारा; लॉकडाऊनमधील वीज बिल घेतल्यास लाखाचा एल्गार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 13:10 IST

आनंद चंदनशिवे : ‘वंचित’ची ग्राहकांसाठी चळवळ

सोलापूर : लॉकडाऊनमध्ये सर्वच घटकांना घरी बंदिस्त व्हावे लागले. रोजगार बुडाला, नोकऱ्या गेल्या अन्‌ डोळ्यासमोर आलेली अंधारी घालवून ‘प्रकाश’ देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी महावितरण सक्तीने बिल वसूल करीत आहे. लॉकडाऊनमधील वीज बिले घेऊ नका, अन्यथा येत्या ८ दिवसामध्ये लाखाचा एल्गार मोर्चा काढण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते तथा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

लॉकडाऊनमधील वीज बिले भरु नका, असे आवाहन करुन चंदनशिवे म्हणाले, लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले होते. त्यामुळे वीज कनेक्शन कट केल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. आजही अनेकांच्या हाताला रोजगार नाही. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन काळातील वीज बिले पूर्णपणे माफ करण्यात यावीत व थकीत वीज बिलासंदर्भात कारवाईचा आदेश रद्द करण्यात यावा. गोरगरीब जनता आणि मध्यमवर्गीयाचे वीज बिल माफ करावे, अशी मागणीही चंदनशिवे यांनी केली आहे. लॉकडाऊनमध्ये वंचित घटकांना अनेक त्रास सहन करावा लागला. आजही हे घटक रोजगारासाठी धडपडत आहेत. याचा विचार राज्य शासनाने जेणेकरुन वीज मंत्रालयाने करावा, असेही त्यांनी सुचवले आहे. वीज बिले भरु नका, याबाबत आघाडीच्या वतीने जनजागरण करण्यात येत असून, त्याबाबत शहरातील हजार रिक्षांवर पत्रके चिटकवण्यात आली आहेत.

पत्रकार परिषदेस नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगुंडे, कोषाध्यक्ष बबन शिंदे, अंजना गायकवाड, जिल्हाध्यक्ष रेश्मा मुल्ला, गौतम चंदनशिवे, अनिरुद्ध वाघमारे, विनोद इंगळे, विठ्ठल पाथरूड, विजयनंद उघडे उपस्थित होते.

गोरगरिबांचे शासन असेल तर त्यांनी गोरगरीब जनता आणि मध्यमवर्गीय (नोकरदार) मंडळींचा विचार करावा. लॉकडाऊनमधील वीज बिल माफ झाले तर ही जनता तग धरणार आहे.

-आनंद चंदनशिवे, नगरसेवक.

टॅग्स :SolapurसोलापूरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीmahavitaranमहावितरण