शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

आता गावागावात मिळणार भाजीपाला; अन्नधान्याची टंचाई होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:51 PM

सोलापूर जिल्हा प्रशासनाची माहिती; भाजीपाला, अन्नधान्य पुरवठासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू

ठळक मुद्देभाजीपाला व अन्नधान्याची टंचाई भासणार नाहीगरज असेल तरच घराबाहेर पडा; प्रशासनाचे आवाहननागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी

सोलापूर : कृषी विभागातर्फे  जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या भाजीपाल्याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या भाजीपाल्याची माहिती प्रत्येक तहसीलदारांकडे देऊन प्रत्येक तालुक्यातील गावामध्ये भाजीपाला मिळेल अशी व्यवस्था करण्यात येत आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात भाजीपाला उपलब्ध आहे त्यांची नावे व्यापाऱ्यांना दिली जातील, तेथून  तो भाजीपाला थेट  नागरिकांपर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न असेल. जिल्हाधिकाऱ्यांनी  बाजार समितीत दररोज सकाळी सहा ते आठ या वेळात भाजीपाला लिलावाला परवानगी दिली आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांच्या गाड्या बाजार समितीकडे येण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. हा भाजीपाला शहरांमध्ये किरकोळ व्यापार्‍यांपर्यंत पोहोचवला जाईल. त्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी विनाकारण कोठेही गर्दी करू नये. 

दररोज भाजीपाला नागरिकांना  आपल्या घराजवळ उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे. सोलापुरात गेल्या दोन दिवसात सकाळी भाजीसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाल्याचे चित्र दिसत आहे. भाजीपाल्याचा तुटवडा होणार नाही दररोज भाजीपाला मार्केट यार्डातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर येणे टाळावे. गरज असेल तेव्हाच खरेदीसाठी बाहेर पडावे भाजीपाला व अन्नधान्याची कोणतीही टंचाई होणार नाही याची खबरदारी प्रशासन घेत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीagricultureशेती