शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

वटपोर्णिमा विशेष ; पत्नीसाठी किडणीदान करून दिली प्रेमाची पावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:19 IST

 जयदीप अन् प्रगती झगडे दाम्पत्याच्या सुखी संसाराची कहाणी

ठळक मुद्दे१५ वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या या दाम्पत्याचा संसार सुखाने सुरूपुण्यामध्ये त्यांच्या किडणीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले

बाळासाहेब बोचरेसोलापूर : मृत्यूच्या दाढेतून आपला प्रिय पती सत्यवानाला परत आणणारी सावित्री आपण पुराणात ऐकली. त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून वटसावित्रीचा सण साजरा करतो. पण आजच्या विज्ञान युगात एका पतीने आपल्या प्रिय पत्नीला किडणी दान करून मृत्यूच्या दाढेतून परत आणून खºया अर्थाने प्रेमाची पावती दिली असून असाच पती प्रत्येकीला जन्मोजन्मी मिळावा, असे वाटल्याशिवाय राहणार नाही. 

विधवेला पुनर्विवाहाची परवानगी नाही. मात्र एक पत्नी जाताच दुसरीसाठी बोहल्यावर चढण्याची घाई करणाºया जमान्यात जयदीप झगडे आणि प्रगती झगडे यांची कहाणी वेगळीच आहे. जयदीप हे मूळचे पुण्याचे असून ते तामलवाडी येथील बालाजी अमाईन्समध्ये नोकरीला आहेत. १५ वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या या दाम्पत्याचा संसार सुखाने सुरू होता. त्यांना एक मुलगीही झाली. पण पाच वर्षांपूर्वीपासून प्रगतीला किडणीचा त्रास सुरू झाला.

पुण्यामध्ये विविध उपचार केले, पण किडणी बदलण्याशिवाय पर्याय नव्हता. रक्तातील नात्याशिवाय किडणी घेण्यास मान्यता नसल्याने माहेरच्या सर्वांच्या किडण्या जुळतात का हे तपासण्यात आले. पण बहुतांशी जणांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांचा काही उपयोग झाला नाही. सर्वांत शेवटी पती जयदीप यांची किडणी तपासण्यात आली असता ती जुळली. पण पुराणमतवादी विचाराच्या काही मित्रांनी व नातेवाईकांनी किडणी न देण्याचा विचार जयदीपच्या मनात भरवला. एक गेली तर दुसरी मिळेल, असाही सल्ला दिला. पण जयदीप यांनी असल्या विचारांना जवळपासही फिरकू दिले नाही.

एक गेली तर मला दुसरी पत्नी मिळेल, हे जरी खरे असले तरी हिच्यासारखी दुसरी मिळेलच हे सांगता येणार नव्हते. शिवाय पत्नी मिळेल, पण माझ्या छोट्या लेकीला ममतेने वाढवणारी आई मिळणार नाही. हा विचार मनात ठेवून पत्नीसाठी किडणीदान करण्याचा निर्णय घेतला. पुण्यामध्ये त्यांच्या किडणीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. आज हे कुटुंब सुखाने जगत आहे. 

जन्मोजन्मी हाच पती मिळो...- याबाबत प्रगती यांना विचारले असता त्या म्हणाल्या, पती-पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून आज वटसावित्रीचा सण साजरा केला जातो. पतीचा जीव वाचवण्यासाठी जीवाचे रान करणाºया बायका पाहिल्या असतील, पण पत्नीसाठी जीव पणाला लावणारा पती हा विरळाच आहे. त्यासाठी फार मोठे मन असावे लागते. तो मनाचा मोठेपणा जयदीपने दाखवला आहे. माझ्यासाठी जीवाचे रान करणारा नवरा मला या जन्मी मिळाला आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा, असेच मी म्हणेन. आपल्या दानाने कोणाचा तरी जीव वाचत असेल तर समाजाने अवयवदान व रक्तदान करण्यास कधीच मागे-पुढे पाहू नये. विज्ञानाने फार प्रगती केली आहे. त्या आधारे आपण कोणाचाही जीव नक्कीच वाचव ूशकतो.

टॅग्स :SolapurसोलापूरWomenमहिलाhospitalहॉस्पिटल