शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वटपोर्णिमा विशेष ; पत्नीसाठी किडणीदान करून दिली प्रेमाची पावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:19 IST

 जयदीप अन् प्रगती झगडे दाम्पत्याच्या सुखी संसाराची कहाणी

ठळक मुद्दे१५ वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या या दाम्पत्याचा संसार सुखाने सुरूपुण्यामध्ये त्यांच्या किडणीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले

बाळासाहेब बोचरेसोलापूर : मृत्यूच्या दाढेतून आपला प्रिय पती सत्यवानाला परत आणणारी सावित्री आपण पुराणात ऐकली. त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून वटसावित्रीचा सण साजरा करतो. पण आजच्या विज्ञान युगात एका पतीने आपल्या प्रिय पत्नीला किडणी दान करून मृत्यूच्या दाढेतून परत आणून खºया अर्थाने प्रेमाची पावती दिली असून असाच पती प्रत्येकीला जन्मोजन्मी मिळावा, असे वाटल्याशिवाय राहणार नाही. 

विधवेला पुनर्विवाहाची परवानगी नाही. मात्र एक पत्नी जाताच दुसरीसाठी बोहल्यावर चढण्याची घाई करणाºया जमान्यात जयदीप झगडे आणि प्रगती झगडे यांची कहाणी वेगळीच आहे. जयदीप हे मूळचे पुण्याचे असून ते तामलवाडी येथील बालाजी अमाईन्समध्ये नोकरीला आहेत. १५ वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या या दाम्पत्याचा संसार सुखाने सुरू होता. त्यांना एक मुलगीही झाली. पण पाच वर्षांपूर्वीपासून प्रगतीला किडणीचा त्रास सुरू झाला.

पुण्यामध्ये विविध उपचार केले, पण किडणी बदलण्याशिवाय पर्याय नव्हता. रक्तातील नात्याशिवाय किडणी घेण्यास मान्यता नसल्याने माहेरच्या सर्वांच्या किडण्या जुळतात का हे तपासण्यात आले. पण बहुतांशी जणांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांचा काही उपयोग झाला नाही. सर्वांत शेवटी पती जयदीप यांची किडणी तपासण्यात आली असता ती जुळली. पण पुराणमतवादी विचाराच्या काही मित्रांनी व नातेवाईकांनी किडणी न देण्याचा विचार जयदीपच्या मनात भरवला. एक गेली तर दुसरी मिळेल, असाही सल्ला दिला. पण जयदीप यांनी असल्या विचारांना जवळपासही फिरकू दिले नाही.

एक गेली तर मला दुसरी पत्नी मिळेल, हे जरी खरे असले तरी हिच्यासारखी दुसरी मिळेलच हे सांगता येणार नव्हते. शिवाय पत्नी मिळेल, पण माझ्या छोट्या लेकीला ममतेने वाढवणारी आई मिळणार नाही. हा विचार मनात ठेवून पत्नीसाठी किडणीदान करण्याचा निर्णय घेतला. पुण्यामध्ये त्यांच्या किडणीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. आज हे कुटुंब सुखाने जगत आहे. 

जन्मोजन्मी हाच पती मिळो...- याबाबत प्रगती यांना विचारले असता त्या म्हणाल्या, पती-पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून आज वटसावित्रीचा सण साजरा केला जातो. पतीचा जीव वाचवण्यासाठी जीवाचे रान करणाºया बायका पाहिल्या असतील, पण पत्नीसाठी जीव पणाला लावणारा पती हा विरळाच आहे. त्यासाठी फार मोठे मन असावे लागते. तो मनाचा मोठेपणा जयदीपने दाखवला आहे. माझ्यासाठी जीवाचे रान करणारा नवरा मला या जन्मी मिळाला आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा, असेच मी म्हणेन. आपल्या दानाने कोणाचा तरी जीव वाचत असेल तर समाजाने अवयवदान व रक्तदान करण्यास कधीच मागे-पुढे पाहू नये. विज्ञानाने फार प्रगती केली आहे. त्या आधारे आपण कोणाचाही जीव नक्कीच वाचव ूशकतो.

टॅग्स :SolapurसोलापूरWomenमहिलाhospitalहॉस्पिटल