शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

लसीकरण, मास्कचा नियमित वापराने दुसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्यातील  ६८७ गावे कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 18:08 IST

५६० गावात संसर्ग: पंढरपूर, माळशिरस तालुक्यात सर्वाधिक हॉटस्पॅाट

सोलापूर: दुसऱ्या लाटेत मास्कचा वापर व लसीकरणावर भर दिल्याने ६७८ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. आता १० पेक्षा जादा रुग्ण असलेली ११८ तर कमी रुग्ण असलेली ४७४ गावे आहेत.

जिल्ह्यात काेरोनाची पहिली लाट २६ एप्रील २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळात आली. त्यानंतर रुग्ण कमी झाले. मार्च २०२१ नंतर रुग्ण वाढत गेले. येथून दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण वाढले. ग्रामीणमधील १ हजार २४३ गावे, वाड्या वस्त्यापैकी बहुतांश ठिकाणी कोरोना पोहोचला. जुलैनंतर शहरात रुग्ण कमी होत गेले. ग्रामीण भागात अक्कलकोट, दक्षिण, उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी, मंगळवेढ्यात रुग्ण कमी झाले. पण पंढरपूर, सांगोला, माळशिरस, माढा व करमाळा या पाच तालुक्यातल संसर्ग कायम आहे.

या तालुक्यातील संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. पंढरपूर तालुक्यात भोसे, गादेगाव, खेळभाळवणी, खरातवाडी, पळशी, माळशिरस तालुक्यात नातेपुते, माळशिरस, कदमवाडी,पिंपरी, अकलुज, कारूंडे, खुडूस, निमगाव, करमाळा तालुक्यात जिंती, देवळाली, उमरड, सांगोला, पाचेगाव, कडलास, महुद, वाटंबरे, आलेगाव, खवासपूर या गावांमद्ये सर्वाधिक रुग्ण ॲक्टीव्ह आहेत. याउलट कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये ग्रामस्थ खबरदारी घेत आहेत. मास्कचा वापर, गरज असेल तरच बाहेर पडणे आणि गावातील ज्येष्ठांचे लसीकरण वाढविण्यावर भर दिल्याने गाव कोरोनामुक्त होण्यास मदत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायतSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय