शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

चाळीस हजार परप्रांतीय मजुरांच्या कामासाठी आता सोलापुरात व्हेकन्सी

By appasaheb.patil | Updated: June 13, 2020 12:54 IST

कामगार परत न आल्यास समस्या; भेळ, पाणीपुरीसह हॉटेल, बांधकाम क्षेत्रात मोठी पोकळी

ठळक मुद्देपंधरा ते वीस वर्षांपासून पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश येथील मजूर सोलापुरात वास्तव्यास होतेआपल्या कामाबद्दल प्रामाणिकपणा आणि कामाचा उरक यामुळे स्थानिक व्यावसायिक त्यांना आवर्जून कामं देत असतसोलापुरातील कामं जशी वाढायला लागली तसे अधिकाधिक मजूरही आपल्या परप्रांतातून रोजीरोटीसाठी सोलापुरात येऊ लागले

सोलापूर : कोरोना महामारीच्या संकटामुळे सोलापूर जिल्ह्यात हॉटेल, बांधकाम, सुतारकाम, रंगारी आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या ३४ हजार परप्रांतीय मजुरांनी सोलापूर सोडले असून, अद्याप सहा हजार कामगार आपल्या गावी जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गावाकडे गेलेले मजूर जर परत आलेच नाहीत तर या क्षेत्रामध्ये जिल्ह्यात मोठी पोकळी निर्माण होणार असून, ही व्हेकन्सी कशी भरून काढायची, हा व्यावसायिकांपुढे मोठा प्रश्न आहे.

कोरोना लॉकडाऊननंतर ३ जूनपासून अनलॉक १ सुरू झाले. तेव्हा विविध दुकानं, शोरूम्स आणि बहुतांश व्यवहार सुरू करण्यास परवानगी मिळाली. अद्याप हॉटेल आणि भेळ, पाणीपुरी आदी खाद्यपदार्थ विक्री करण्यास परवानगी दिली नसली तरी लवकरच ती मिळणार आहे. जी बांधकामं पूर्ण होऊन अंतर्गत कामे करायची राहिली आहेत, ती सुरू करण्यासाठी या क्षेत्रातील व्यावसायिकांना आता कामगारांचा तुटवडा जाणवत आहे.

पंधरा ते वीस वर्षांपासून पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश येथील मजूर सोलापुरात वास्तव्यास होते. आपल्या कामाबद्दल प्रामाणिकपणा आणि कामाचा उरक यामुळे स्थानिक व्यावसायिक त्यांना आवर्जून कामं देत असत. सोलापुरातील कामं जशी वाढायला लागली तसे अधिकाधिक मजूरही आपल्या परप्रांतातून रोजीरोटीसाठी सोलापुरात येऊ लागले. जिल्हाभर हे मजूर कार्यरत होते. कोरोना लॉकडाऊनच्या काळात विशेष रेल्वेने ते गावी परतले. आणखी ६ हजार ३२५ परप्रांतीय आपल्या राज्यात जाण्यासाठी प्रतीक्षा करीत आहेत.

बांधकाम व्यावसायिकांवर परिणाम...- बांधकाम क्षेत्रात फरशी कटिंग, पीओपी, बांधकाम, गिलाव, प्लंबरसह कमी-जास्त विटा उचलणे, सिमेंट वाहणारे आदी कामे करणारे सर्वाधिक परप्रांतीय होते. सगळेच परप्रांतीय गेले असे नाही, काही परप्रांतीय कारागीर अजून सोलापुरातच आहेत. मात्र बांधकाम क्षेत्रावर त्या गेलेल्या परप्रांतीयांमुळे परिणाम होतोय, कामे संथगतीने सुरू आहेत, एवढे मात्र खरे, अशी माहिती बांधकाम व्यावसायिक सुनील फुरडे यांनी दिली. 

जेव्हा सुरुवातीला हॉटेल रेस्टॉरंट सुरू होतील तेव्हा कामगारांची गरज भासणार नाही; मात्र सर्व सुरळीत झाल्यानंतर नक्कीच कामगारांची गरज लागेल, तोपर्यंत सोलापूर सोडून गेलेले परप्रांतीय पुन्हा नक्कीच सोलापुरात येतील, अशी आशा आहे. कामगारांची गरज भासल्यास नक्कीच कामासाठी कामगारांची शोधाशोध सुरु होईल. - अनिल चव्हाण, हॉटेल व्यावसायिक, सोलापूर

परप्रांतीय जेव्हा सोलापूर सोडून त्यांच्या मूळ गावी जात होते, त्यावेळी सोलापुरातील प्रत्येकाने आदराने त्यांना त्यांच्या गावी पाठवले आहे. त्यामुळे ते परप्रांतीय नक्कीच सोलापुरात येतील; मात्र ते आल्यानंतर त्यांना काम मिळेल का नाही? हे मात्र सांगता येत नाही, तोपर्यंत आपले लोक त्या प्रकारचे काम शिकतील आणि सेट होतील. परप्रांतीय गेल्याचा सोलापूरला परिणाम होणार नाही. - शरद ठाकरे,व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी हायड्रॉलिक्स, सोलापूर 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरीbusinessव्यवसाय