शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

ऊस शेतीसाठी नैसर्गिक खते वापरा ; सिद्धेश्वर कारखान्यातील परिसंवादात कृषी तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 14:44 IST

सोलापूर :  उसाची शेती करताना शेणखत, गांडूळ खत या सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते़ शेतकºयांनी नैसर्गिक शेतीचा आग्रह धरावा, असे आवाहन मृदा शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे यांनी कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात बोलताना केले.कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकºयांसाठी परिसंवाद आयोजित केला होता. ...

ठळक मुद्देऊस पिकासाठी माती परीक्षण महत्त्वाचेपारंपरिक शेतीचे दिवस आता संपले तंत्रज्ञानाचा वापर केला नाही तर शेती तोट्यात

सोलापूर :  उसाची शेती करताना शेणखत, गांडूळ खत या सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते़ शेतकºयांनी नैसर्गिक शेतीचा आग्रह धरावा, असे आवाहन मृदा शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे यांनी कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात बोलताना केले.

कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकºयांसाठी परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात मृदा शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे आणि कीटकनाशक तज्ज्ञ डॉ़ पांडुरंग मोहिते यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी होते. कारखान्याच्या कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात हा परिसंवाद पार पडला.

ऊस पिकासाठी माती परीक्षण महत्त्वाचे असून, शेतकºयांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत आबासाहेब साळुंखे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, कोणतेही पीक घेण्यासाठी माती परीक्षणाची गरज आहे. मातीमध्ये कोणते घटक आहेत, याची तपासणी झाल्याखेरीज तिला नवीन अन्नघटक काय द्यावे लागतील, हे कळणार नाही. पारंपरिक शेतीचे दिवस आता संपले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर केला नाही तर शेती तोट्यात जाते असे सांगताना उसाच्या शेतीसाठी माती परीक्षण, सरी पद्धत, मातीतील जीवाणूंचे रक्षण आदींमुळे उत्पादन वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले.

 या परिसंवादाला कारखान्याचे संचालक रमेश बावी, गुरुसिद्ध म्हेत्रे, सुरेश झळकी, मल्लप्पा चांभार, काशिनाथ कोळी, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, बळीराजा मासिकाचे युवराज भोसले यांची उपस्थिती होती़ शेतकºयांचा प्रतिसाद उत्तम होता. कारखान्याचे ऊसविकास अधिकारी विजयकुमार सरूर यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक सिद्धाराम चाकोते यांनी आभार मानले.

प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घ्या- उसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, याची काळजी शेतकºयांनी आधीपासून घेतली पाहिजे़ त्यासाठी वेळोवेळी फवारण्यांची गरज असल्याचे मत कीटकनाशक तज्ज्ञ डॉ़ पांडुरंग मोहिते यांनी मांडले़ अध्यक्षपदावरून बोलताना धर्मराज काडादी यांनी साखर कारखानदारी संकटातून मार्गक्रमण करीत असल्याचे सांगितले़ आठ दिवसांत शासनाने नवीन धोरणाचा स्वीकार केल्यामुळे साखर उद्योगाला मदत होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेती