शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

ऊस शेतीसाठी नैसर्गिक खते वापरा ; सिद्धेश्वर कारखान्यातील परिसंवादात कृषी तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 14:44 IST

सोलापूर :  उसाची शेती करताना शेणखत, गांडूळ खत या सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते़ शेतकºयांनी नैसर्गिक शेतीचा आग्रह धरावा, असे आवाहन मृदा शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे यांनी कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात बोलताना केले.कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकºयांसाठी परिसंवाद आयोजित केला होता. ...

ठळक मुद्देऊस पिकासाठी माती परीक्षण महत्त्वाचेपारंपरिक शेतीचे दिवस आता संपले तंत्रज्ञानाचा वापर केला नाही तर शेती तोट्यात

सोलापूर :  उसाची शेती करताना शेणखत, गांडूळ खत या सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते़ शेतकºयांनी नैसर्गिक शेतीचा आग्रह धरावा, असे आवाहन मृदा शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे यांनी कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात बोलताना केले.

कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकºयांसाठी परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात मृदा शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे आणि कीटकनाशक तज्ज्ञ डॉ़ पांडुरंग मोहिते यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी होते. कारखान्याच्या कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात हा परिसंवाद पार पडला.

ऊस पिकासाठी माती परीक्षण महत्त्वाचे असून, शेतकºयांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत आबासाहेब साळुंखे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, कोणतेही पीक घेण्यासाठी माती परीक्षणाची गरज आहे. मातीमध्ये कोणते घटक आहेत, याची तपासणी झाल्याखेरीज तिला नवीन अन्नघटक काय द्यावे लागतील, हे कळणार नाही. पारंपरिक शेतीचे दिवस आता संपले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर केला नाही तर शेती तोट्यात जाते असे सांगताना उसाच्या शेतीसाठी माती परीक्षण, सरी पद्धत, मातीतील जीवाणूंचे रक्षण आदींमुळे उत्पादन वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले.

 या परिसंवादाला कारखान्याचे संचालक रमेश बावी, गुरुसिद्ध म्हेत्रे, सुरेश झळकी, मल्लप्पा चांभार, काशिनाथ कोळी, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, बळीराजा मासिकाचे युवराज भोसले यांची उपस्थिती होती़ शेतकºयांचा प्रतिसाद उत्तम होता. कारखान्याचे ऊसविकास अधिकारी विजयकुमार सरूर यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक सिद्धाराम चाकोते यांनी आभार मानले.

प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घ्या- उसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, याची काळजी शेतकºयांनी आधीपासून घेतली पाहिजे़ त्यासाठी वेळोवेळी फवारण्यांची गरज असल्याचे मत कीटकनाशक तज्ज्ञ डॉ़ पांडुरंग मोहिते यांनी मांडले़ अध्यक्षपदावरून बोलताना धर्मराज काडादी यांनी साखर कारखानदारी संकटातून मार्गक्रमण करीत असल्याचे सांगितले़ आठ दिवसांत शासनाने नवीन धोरणाचा स्वीकार केल्यामुळे साखर उद्योगाला मदत होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेती