शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गारपिटीचा  १०४ गावांना फटका; ३४७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका

By विठ्ठल खेळगी | Updated: March 19, 2023 17:52 IST

अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यातील ८ तालुक्यातील १०४ गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे.

सोलापूर : अवकाळीने जिल्ह्यातील ८ तालुक्यातील १०४ गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष, ज्वारी, गहू, केळी, कांदा पपई, कलिंगड, आंबा, पेरू व ज्वारीच्या ३४७० हेक्टरचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तयार केला आहे. 

सोलापूर जिल्ह्यात गुरुवार व शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे उत्तर तालुक्यातील ११ तसेच माळशिरस व बार्शी तालुक्यातील २.८० असे १३.८० हेक्टरचे नुकसान झाले होते. शनिवारी दुपारपासून जिल्हाच्या विविध वादळ, वारे, गारपीटसह पाऊस पडला. यामुळे माढा, उत्तर सोलापूर व सांगोला तालुके वगळता आठ तालुक्यातील पीकांना झळ पोहोचली. आंबे गळून पडले तर द्राक्षाच्या घडात पाणी शिरल्याने नुकसान पोहोचले. गहू, ज्वारी भिजून गेली व कडबा काळा पडला. पपई, चिक्कू, पेरुचे नुकसान झाले. कांद्याचा रेंदा झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. 

सर्वाधिक झळ अक्कलकोटलाशनिवारी झालेल्या गारपीट, वादळ व पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील ३८ गावच्या ८१९ शेतकऱ्यांच्या ३२२ हेक्टर क्षेत्रातील पीकांचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट पाठोपाठ माळशिरस तालुक्यातील २८ गावच्या ७३० शेतकऱ्यांच्या ६२५ हेक्टरमधील पीकांची हानी झाली आहे. करमाळा तालुक्यातील १२ गावच्या ३०९ शेतकऱ्यांच्या २१६ हेक्टर पीकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील ९ गावच्या ७६ शेतकऱ्यांचे ५८ हेक्टर पीकहानी झाल्याचे सांगण्यात आले. पंढरपूरच्या ६ गावांना गारपीटीचा तडाखा बसला आहे. ६ गावांतील २४०० शेतकऱ्यांच्या १८५० हेक्टरमधील पीकांना नुकसान पोहोचले आहे. बार्शी तालुक्यातील ४ गावच्या २३६ हेक्टरमधील १८० हेक्टर, दक्षिण तालुक्यातील ४ गावांतील १३२ शेतकऱ्यांच्या ८३ हेक्टरचे तर मंगळवेढा तालुक्यातील ३ गावांतील ६७ शेतकऱ्यांच्या १३६ हेक्टर क्षेत्रात नुकसान पोहोचले आहे. अवकाळी पाऊस व गारा पडल्याने रब्बी हंगामातील व इतर पीकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार गुरुवार, शुक्रवार व शनिवारी पडलेला पाऊस हानीकारक  ठरला आहे. ज्यांनी रब्बी हंगामातील पीकांचा विमा भरला आहे त्यांनी विमा कंपनीकडे पीक नुकसानीबाबत तक्रार ( इंटीमेशन) नोंदवावी. - बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसFarmerशेतकरी