शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

‘मी टू’चा अर्थ नीट समजून घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 2:16 PM

गेल्या काही दिवसांपासून ‘मी टू’ मोहिमेमुळे समाज हादरून गेला आहे. मनोरंजन, शिक्षण, राजकारण तसेच कॉर्पोरेटसारख्या अनेक क्षेत्रांतील महिलांनी त्यांच्यावरील ...

गेल्या काही दिवसांपासून ‘मी टू’ मोहिमेमुळे समाज हादरून गेला आहे. मनोरंजन, शिक्षण, राजकारण तसेच कॉर्पोरेटसारख्या अनेक क्षेत्रांतील महिलांनी त्यांच्यावरील लैंगिक अत्याचाराविषयी उघडपणे तक्रारी माध्यमांपुढे मांडल्यामुळे सर्व क्षेत्रांची प्रतिमा मलीन झाली. दररोज पीडित महिला पुढे येत आहेत. त्यामुळे दस्तुरखुद्द केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी अशाच आरोपामुळे राजीनामा दिल्याने केंद्र सरकारदेखील अडचणीत आले आहे.

भारतीय नागरिकांना शरमेने मान खाली घालावी लागत आहे. ज्या महिला ‘मी टू’ म्हणत पुढे आल्या त्यापेक्षा कितीतरी पटीने लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक महिलांनी दबावाखाली अध्यापही धाडस केलेले नाही. समाज, कुटुंब, नोकरीची भीती, जगण्याची दुसरी सोय नसल्याने अनेक कष्टकरी, नोकरदार महिला मुकाट्याने लैंगिक अत्याचार सहन करीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ समोर आलेल्या महिलांपुरता सीमित नाही.आपल्या देशातील पुरुषप्रधान समाजरचनेमुळे स्त्रीला दिले जाणारे दुय्यम स्थान हेच या समस्येचे मूळ आहे. त्यामुळे ही समस्या केवळ कायद्याने सुटणार नाही.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत पुरुषांचे प्रबोधन तसेच कुटुंब, शाळा, समाज अशा सर्व ठिकाणी स्त्री-पुरुष दोघांनाही समानतेची वागणूक मिळण्याची व्यवस्था व्हायला हवी. घरात अजूनही वंशाचा दिवा म्हणून नाकर्त्या मुलालाही मुलींच्या तुलनेने प्राधान्य दिले जाते. पत्नीला तुच्छ लेखणाºया नवºयाला केवळ कायदे सुधारू शकणार नाहीत तर सामाजिक नियमनातून पुरुषांना सुधारणे गरजेचे आहे. घर आणि शाळा या दोन्ही व्यवस्थांमधून स्त्री-पुरुष समानतेचे कृतिशील देण्याची गरज आहे. हा राष्ट्रीय कार्यक्रम बनला पाहिजे. समाजातील प्रत्येकाला याविषयी सकारात्मक मानसिकता दिल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.

 ‘मी टू’ ही चळवळ मुख्यत: स्त्रियांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध वाचा फोडण्यासाठी समाज माध्यमांच्या माध्यमातून सुरु झाली. माध्यमांच्या मर्यादा आणि दुरुपयोगातून चळवळीचे गांभीर्य नष्ट होता कामा नये. नको त्या गोष्टींवर चर्चा करून पीडित स्त्रीला न्याय मिळण्यात अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या मांडणीतून स्त्री विरुद्ध पुरुष भूमिका घेत दोघांना एकमेकांच्या विरोधात उभे केल्याने चळवळ भरकटत जाईल.

‘मी टू’ ने निर्माण केलेले वातावरण स्त्रीवरील अन्याय समजून घेण्यासाठी उपयोगी पडावे. स्त्री-पुरुष एकत्रित येण्याची संधी वाढावी. महिलांना अधिकाधिक क्षेत्रामध्ये स्वीकारले जाईल यासाठी पुरुषांना शत्रू बनवून चालणार नाही. काही समाजकंटक पुरुषांच्या दुष्कृत्यामुळे समस्त पुरुषवर्गाला दोष दिल्याने आपले सहानुभूतीदार आणि मदतगार लांब जाऊ नयेत याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. यानिमित्ताने होत असलेले विचारमंथन स्त्रियांच्या बाजूने राहण्यासाठी योग्य वागणूक अपेक्षित आहे.

 स्त्री घराबाहेर जशी असुरक्षित आहे तशीच ती घरातही आहे. विद्यमान कायदे आणि न्यायव्यवस्था भारतीय स्त्रीला योग्य न्याय देऊ शकत नाही. कायदा आणि न्यायव्यवस्थेपेक्षा ‘समाज’ नावाची पुरुषांच्या हाती एकवटलेली सत्ता अधिक बळकट आहे. ‘मी टू’मधून बहुतेक उच्चवर्गीय तसेच उच्च मध्यमवर्गीय महिलांच्याच व्यथा पुढे येत आहेत. दलित, मागासलेल्या, ग्रामीण, आदिवासी अशा निम्न वर्गातील स्त्रीचे विशेषत: अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार धनदांडग्यांनी गृहीतच धरलेले असते. या महिला जेव्हा ‘मी टू’ म्हणत पुढे येतील, संघर्ष करतील ते कोणाच्याही नियंत्रणाच्या बाहेर असेल.

समस्त पीडित आणि शोषित स्त्री वर्ग एकत्रित आला तर मात्र क्रांती अटळ आहे. काहींना हा केवळ कल्पनाविलास नव्हे आता महिला न्याय-हक्कासाठी एकत्रित होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ते नीटपणे समजून घेऊनच ‘मी टू’सारख्या मोहिमेचा उद्रेक थांबविता येईल. सिनेमा, माध्यमे, राजकारण, कॉर्पोरेट तसेच भरमसाठ फी घेऊन शिक्षणाचा धंदा करणाºया संस्थेतील समोर आलेली लैंगिक अत्याचाराची प्रकरणे नैतिक अध:पतनाचे द्योतक आहे. त्याची पाळेमुळे खोदून योग्य न्याय देत निम्मी लोकसंख्या असणाºया स्त्रीवर्गाला स्वतंत्र माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय विजयादशमीच्या निमित्ताने केलेला ‘स्त्री जागर’ यशस्वी ठरणार नाही.- प्रा़ विलास बेत(लेखक सामाजिक शास्त्राचे अभ्यासक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयNana Patekarनाना पाटेकरTanushree Duttaतनुश्री दत्ता