शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दक्षिण सोलापूरसाठी उजनीचे पाणी फक्त कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:22 AM

उजनी धरणापासून १४० किमी अंतर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्याला उजनीचे पाणी मिळावे यासाठी राजकीय नेत्यांनी लढे उभे केले. शेतकऱ्यांनी ...

उजनी धरणापासून १४० किमी अंतर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्याला उजनीचे पाणी मिळावे यासाठी राजकीय नेत्यांनी लढे उभे केले. शेतकऱ्यांनी या लढ्यात स्वतःला झोकून दिले. तालुक्यासाठी धरणात आरक्षित ठेवलेले पाणी अजूनही शेतीला मिळाले नाही. पाणी देणाऱ्या योजना रखडल्या. त्यामुळे उजनीचे पाणी दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी मृगजळ ठरले. या तालुक्याने पाण्यासाठी सर्वाधिक संघर्ष केला. तरीही प्रतीक्षा संपली नाही. कधी योजनेला निधी मिळत नाही तर कधी सुधारित प्रशासकीय मान्यता नसल्याचे कारण सांगत पाणी कागदावरच राहिले.

सध्या कुरुल शाखा कालवा आणि बेगमपूर कालव्यातून तालुक्यातील कंदलगाव, वडकबाळ, मंद्रुप, गुंजेगाव आदी भागांना प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी मिळते. मात्र, एकरुख उपसा सिंचन योजना पूर्णत्वास न आल्याने ७२०० हेक्टर क्षेत्र सिंचनाच्या प्रतीक्षेत आहे. ही योजना पूर्ण झाली असली तरी आरक्षित असलेले पाणी पूर्ण क्षमतेने मिळेल, ही आशा आता शेतकऱ्यांना वाटत नाही. हक्काचे पाणी मिळवण्यासाठी संघर्ष केला; पण मिळालेले पाणी प्रत्यक्ष शेतात कधी पोहोचणार या प्रश्नाने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. विशेषतः उजनीचे पाणी मिळेल या भरवशावर तरुण पिढी शेती क्षेत्रात उतरली. मात्र, त्यांचाही भ्रमनिरास झाला आहे.

आठमाहीची ऐतिहासिक घोषणा

उजनीचे पाणी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना मिळाले पाहिजे, या मागणीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडे दिवंगत आनंदराव देवकते यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर याच तालुक्यात कंदलगाव येथील पाणी परिषदेत शंकरराव चव्हाणांनी उजनीचे बारमाही धोरण बदलून आठमाही केले. त्याचा लाभ संपूर्ण जिल्ह्याला झाला. सिंचन क्षेत्रात दुपटीने वाढ झाली; पण ज्या तालुक्याने संघर्ष केल्यामुळे उजनीच्या धोरणात बदल करावा लागला तोच तालुका आजही वंचित आहे.

एकरुख योजना अर्धवटच

१९९६ साली प्रशासकीय मान्यता मिळालेली एकरुख उपसा सिंचन योजना तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागातील ३४ गावांना उपयुक्त ठरणार आहे. मात्र, योजनेचे काम २५ वर्षांनंतरही अर्धवट स्थितीत राहिल्याने पाणी मिळणार कधी? अशी संभ्रमावस्था शेतकऱ्यांत आहे. सध्या याच योजनेतून अक्कलकोट तालुक्यातील बोरी धरणात सोडण्याची तयारी झाली; पण दक्षिण सोलापूरची कालव्याची कामे अपूर्ण, भूसंपादन नाही, अंतर्गत पाइपलाइनची कामे अपूर्ण या कारणाने येत्या दोन वर्षांत पाणी मिळण्याची शक्यता धूसर दिसते.

दोन्ही योजना अधांतरी

एकरुख योजनेतून दक्षिण सोलापूर तालुक्याला ७,२०० हेक्टर तर देगाव जलद कालव्यातून ३,८६० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. दोन्ही योजनांचे भवितव्य आज तरी अधांतरीच आहे. एकरुखचे काम रेंगाळत सुरू आहे, तर देगाव कालव्याच्या कामांसाठी आवश्यक निधी मिळत नाही. त्यामुळे ११,०६० हेक्टर क्षेत्राला उजनीच्या पाण्याचे वेध लागले आहेत.

१४ गावांचे स्वप्न अपुरे राहणार

तालुक्यातील बोरामणी, तांदूळवाडी, मुस्तीसह १४ गावांना उजनीचे पाणी मिळावे, यासाठी दिवंगत उमाकांत राठोड यांनी संघर्ष केला. आजी-माजी आमदारांनी या योजनेसाठी राजकीय वजन वापरले; परंतु उजनी प्रकल्पात नव्या योजनांसाठी पाणीच उपलब्ध नसल्याने १४ गावांना पाणी देणार कसे, असा सवाल जलसंपदा विभागाचे अधिकारी विचारत आहेत.

फाेटो

२६दक्षिण सोलापूर०१

सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील अर्धवट स्थितीत असलेला देगाव जलद कालव्याचा जलसेतू.

२६दक्षिण सोलापूर०२

उजनीच्या पाण्याचे तालुकानिहाय झालेले नियोजन.