शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

दोन विमाने उडाली, पण कृत्रिम पाऊस पडलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 03:49 IST

सोमवारी दिवसभर काळे ढग असताना विमानांचे उड्डाण झाल्याचे समजल्याने कृत्रिम पाऊस पडणार असे वाटत होते.

सोलापूर : दोन विमाने हवेत उडाली व पाहणी करून परत आली एवढीच प्रतिक्रिया कृत्रिम पावसाबाबत सोमवारी देण्यात आली. पुष्य नक्षत्रही कोरडेच जाऊ लागल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांना कृत्रिम पावसाचा आधार मिळेल असे वाटत असले तरी सध्या तसे चित्र नाही.

सोमवारी दिवसभर काळे ढग असताना विमानांचे उड्डाण झाल्याचे समजल्याने कृत्रिम पाऊस पडणार असे वाटत होते. काही भागात रिमझिम सरीही पडल्या. त्यामुळे कृत्रिम पाऊस पडल्याची चर्चा सगळीकडे सुरू होती. विमान ज्या भागातून गेले त्या भागातील लोकांनी कृत्रिम पाऊस पडल्याची भावना व्यक्त केली आहे. असे असले तरी याला भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेने दुजोरा दिला नाही. एका विमानाचे दुपारी एक वाजता व दुसºया विमानाचे अडीच वाजता उड्डाण झाले. ही दोन्ही विमाने सायंकाळी पाचनंतर सोलापूर विमानतळावर दाखल झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :MumbaiमुंबईRainपाऊस