शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
4
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
5
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
6
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
7
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
8
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
9
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
10
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
11
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
12
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
13
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
14
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
15
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
16
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
17
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
18
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
19
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
20
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा

लग्नानंतर नवदाम्पत्याला घेऊन देवदर्शनाला गेले; परतताना भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 11:26 IST

लग्नानंतर देवकार्य उरकून परतताना घडली दुर्घटना.

Solapur Accident ( Marathi News ) : तेलंगणा राज्यातील भैरमकोट येथून देवकार्य उरकून सोलापूरला येत असताना, कर्नाटकातील आळंद येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून धडक दिल्याने जीपमधील दोन ठार, तर सहा जण गंभीर जखमी झाले. हा दुर्दैवी अपघात शनिवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडला. 

काशीबाई सुरेश चव्हाण (वय ६०), अंबादास बाबूराव पेंदू (वय ४८, दोघे रा. विनायकनगर) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. तर सुनील सुरेश चव्हाण (वय ४०), अनिल सुरेश चव्हाण (वय ४२), सुरेश बाबूराव चव्हाण (वय ६०), सानवी सुनील चव्हाण (वय ०४, चौघे रा. विनायकनगर, एमआयडीसी), अनुराधा चंद्रकांत गांगजी (वय ४०, रा. भवानी पेठ), विजय शंकरसा श्रीगिरी (वय ५०, रा. निलमनगर) हे सहा जण जखमी झाले आहेत. 

अधिक माहिती अशी, चव्हाण कुटुंबीयात २५ नोव्हेंबर रोजी भारत चव्हाण यांचे लग्नकार्य पार पडले होते. त्यानंतर नवदाम्पत्याला घेऊन कुटुंबीय जीप गाडीतून तेलंगणा राज्यातील भैरमकोट येथे देवकार्यासाठी गेले होते. देवकार्य पार पडल्यानंतर ते शुक्रवारी रात्री पुन्हा सोलापूरच्या दिशेने निघाले होते. जीपमधून सर्व कुटुंबीय सोलापूरला येत असताना, कर्नाटक राज्यातील अळंद येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका मालट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. धडक दिल्यानंतर जीप पुढे जाऊन २ ते ३ वेळा उलटली. यात काशीबाई चव्हाण व अंबादास पेंदू हे जागीच ठार झाले. अपघातामधील सहा जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी शनिवारी पहाटे व दुपारी १२ वाजेच्या सुमारास सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात