शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

तेलंगणा, आंध्र आणि तामिळनाडूतील अडीचशे मुली सोलापुरात अडकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 13:03 IST

दिल्लीच्या कंपनीचा पोबारा; नोकरीच्या आमिषाने मुलींकडून वसूल केले कोट्यावधी रुपये

सोलापूर : आमची मोठी कार्पोरेट कंपनी आहे. कंपनीमार्फत मार्केटिंंग करून लाखो रुपये कमवा, असे आमिष दिल्लीतील एका कंपनीने दाखवले. या आमिषाला बळी पडून आंध्र, तेलंगणा आणि तामिळनाडूतील शेकडो मुली सोलापुरात आल्या. लॉकडाऊनच्या काळात कंपनीने हात वर करून सोलापुरातून पोबारा केला. कंपनीचे प्रतिनिधी मुलींकडे लक्ष देईनात. मुलींचे हाल सुरू असल्याने मुलींना सोनी महाविद्यालयाच्या एनजीओमार्फत निवारा देण्यात आला आहे. मनपा प्रशासनाकडून त्यांची देखभाल सुरू आहे.

सर्व मुलींना त्यांच्या गावी जाण्याची ओढ लागली आहे. याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून मुलींना आंध्रात आणि तेलंगणात पाठवून देण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विटरद्वारे केली आहे. त्यामुळे या विषयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आंध्रातील एका आमदाराने सोलापुरातील नगरसेवक नागेश वल्याळ यांना फोन करून मुलींची मदत करायला सांगितले आहे. त्यानंतर वल्याळ यांनी सैफुल येथील सोनी महाविद्यालयाकडे धाव घेतली.

तामिळनाडू येथील के. सुगना देवी यांनी अत्यंत आक्रमक आणि निराशेतून लोकमतकडे भावना व्यक्त केल्या. त्या अस्सल इंग्रजी बोलतात. त्या विवाहित असून, त्यांना दोन मुले आहेत. गावाकडे या एका इंग्रजी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. चांगली नोकरी मिळेल आणि चांगला पगारही मिळेल, या आशेने त्या काही दिवसांपूर्वी सोलापुरात आल्या.

सोलापुरात आल्यानंतर त्यांना मार्केटिंंग करायला सांगितले, ते त्यांना जमणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. सोमनाथ देव यांच्याकडून कंपनीने १७ हजार रुपये उकळल्याचा आरोप देव यांनी केला. आता त्यांच्याकडे खायला आणि राहायलाही पैसे नाहीत. प्रशासनाकडून त्यांना तामिळनाडूकडे पाठवण्याची व्यवस्था झाली आहे. याबाबत त्या समाधानी असल्या तरी कंपनीविरोधात वकिलामार्फत केस करणार असल्याचे त्या आक्रमकपणे सांगतात.

कंपनीकडून दिशाभूल.. आता नवºयाला काय सांगू? - आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील रहिवासी कोईलदा कृष्णवेणी (शिक्षण- बी.कॉम. कॉम्प्युटर) या सांगतात, कृषीविषयक नोकरी देण्यात येईल, असे आमिष मला दिल्ली येथील एका कंपनीने दाखवले. माझ्याकडून अठरा हजार रुपयेदेखील वसूल केले. नोकरीच्या आमिषाने मी अठरा हजार रुपये कंपनीला दिले. नोकरीकरता मला सोलापुरात यावे लागेल, असे कंपनीकडून सांगितल्यानंतर मी सोलापुरात आले. सोलापुरात आल्यानंतर कळाले की, सदर कंपनी कृषीविषयक नोकरी न देता मार्केटिंंग करायला सांगितले. मला मार्केटिंंग येत नव्हते. त्यामुळे मी मार्केटिंंग करणार नसल्याचे कंपनीला साफ सांगितले. कंपनीला दिलेले १८ हजार रुपये देखील परत करायला सांगितले. कंपनीने का...कूं....करत फक्त बारा हजार रुपये परत केले, उर्वरित सहा हजार रुपये देणार नसल्याचे सांगितले. मागील ३ महिन्यांपासून मी सोलापुरातच अडकून आहे. विवाहित असून, आता पुन्हा गावाकडे जाण्याची ओढ लागली आहे. गावाकडे गेल्यानंतर नवºयाला काय उत्तर देऊ, याची अनामिक भीती लागून राहिली आहे.

सर्व मुलींना पहिल्यांदा त्यांच्या गावी पाठवा...झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने आणि चांगली नोकरी मिळेल, या आमिषाने या सर्व मुली सोलापुरात आल्या. येथे आल्यानंतर सर्वांच्या आशा आणि अपेक्षांचा चक्काचूर झालेला आहे. तीन राज्यांतील अडीचशे मुली सोलापुरात अडकून आहेत, त्या सर्व जण निराश आहेत. त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर प्रशासनाने पहिल्यांदा त्यांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करावी. चंद्राबाबू नायडू यांनी उद्धव ठाकरे यांना ट्विटरद्वारे विनंती केली आहे आणि तथाकथित कार्पोरेट कंपनीची चौकशी व्हायला पाहिजे, याकरिता मी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.- नागेश वल्याळ, नगरसेवक, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTamil Thalaivasतमीळ थलायवाज