शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

शेतात बोरे खाण्यासाठी गेलेल्या डोणगांव येथील दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 11:40 IST

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील एका शेतात बोरे खाण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्याच्या डबक्यात पडून मृत्यू ...

ठळक मुद्देसमर्थ विपुल गायकवाड (वय ८), नंदिनी अशोक मस्के (वय ८) अशी मरण पावलेल्या दोन विद्यार्थ्यांची नावे शेतात बोरे खाण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्याच्या डबक्यात पडून मृत्यू

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील एका शेतात बोरे खाण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्याच्या डबक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळी ७.३० ते १२ दरम्यान अर्ध्या दिवसाची शाळा ठरली जीवघेणी. 

समर्थ विपुल गायकवाड (वय ८), नंदिनी अशोक मस्के (वय ८) अशी मरण पावलेल्या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत. समर्थ गायकवाड व नंदिनी मस्के हे दोन्ही विद्यार्थी डोणगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकत होते. दररोज या मुलांची शाळा सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत चालत होती. सोमवारी काही कारणास्तव शाळा सकाळी ७.३० ते १२ या वेळेत ठेवण्यात आली होती. नेहमीपेक्षा सोमवारी शाळा लवकर सुटल्याने ही मुले घरी आली. समर्थ गायकवाड याचे वडील हे मजूर असून, ते दुसºयाच्या शेतात ऊस काढण्यासाठी गेले होते. आई नातेवाईकाच्या येथे कार्यक्रम असल्याने गेली होती. 

नंदिनी मस्के हिचे आई-वडीलही शेतात काम करण्यासाठी गेले होते. दोन्ही मुलांची घरे गावात जवळच होती. घरात कोणी नसल्याने या दोन्ही मुलांनी   शेतात बोरे खाण्याचा निर्णय घेतला. दोघांसोबत समर्थ याची लहान बहीण समृद्धीसुद्धा होती. सर्व जण घरापासून १ कि.मी. अंतरावर लांब असलेल्या शिवाप्पा आमले यांच्या शेतात गेले. तेथील झाडाची बोरं खाताना खेळत खेळत जवळच असलेल्या डबक्याजवळ गेली. जेसीबीच्या सहायाने खोदण्यात आलेल्या डबक्यात १० फूट पाणी होते. डबक्याजवळ खेळत असताना दोन्ही मुले पाण्यात पडली. हा प्रकार पाहून सोबत असलेली समृद्धी घराकडे पळत सुटली. तिने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने आपल्या शेजारच्या नातेवाईकांना सांगितला. 

हा प्रकार समजताच नीलेश गायकवाड व अरविंद गायकवाड हे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, या प्रकारामध्ये एक ते दीड तासाचा काळ उलटून गेला होता. नीलेश गायकवाड याने पाण्यात उडी मारून मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला. प्रथमत: नंदिनी मस्के ही मुलगी मिळून आली. तिला वर काढल्यानंतर पुन्हा नीलेश गायकवाड याने पाण्यात उडी मारली. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर समर्थ याला बाहेर काढण्यात यश आले. दोघांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दोघे मृत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी