शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सावळेश्वर, वरवडे, तामलवाडी, येडशी टोलनाक्यांवरील टोल वाढला

By appasaheb.patil | Updated: April 2, 2019 18:40 IST

१ एप्रिलपासून झाली अंमलबजावणी : सावळेश्वर, वरवडे, तामलवाडी, येडशी टोलनाक्यांवर दर आकारणी

ठळक मुद्दे आता वाहनधारकांना ५ ते १५ रुपये अधिकचा टोल द्यावा लागणारवाढत्या वाहनांच्या किमती व वाढते इंधनाचे दर यामुळे वाहनधारक त्रस्त सोलापूर -पुणे हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्यामुळे सोलापूर ते पुणे हे सहा ते सात तासांचे अंतर आता वाहनधारक तीन ते साडेतीन तासांतच पूर्ण करू लागले

सोलापूर : आय़ एल़ अ‍ॅण्ड एफ़एस., पुणे-सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड व आयआरबीने आता कंत्राटातील नियमांचा आधार घेत वाढीव दराची १ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील तामलवाडी, वरवडे तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी व येडशी टोलनाक्यांवर आता वाहनधारकांना ५ ते १५ रुपये अधिकचा टोल देऊन प्रवास करावा लागणार आहे़ या वाढीव टोलमुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने पुणे-सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड व आय़ एल़ अ‍ॅण्ड एफ़ एस. ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड या दोन कंपन्यांची स्वत:ची गुंतवणूक करून सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग तयार केला. त्यानंतर गुंतवणूक केलेल्या पैशाची परतफेड करण्यासाठी  वरवडे (ता़ माढा) व सावळेश्वर (ता़ मोहोळ) या दोन्ही ठिकाणी टोलनाका उभारला.

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील सोलापूर ते येडशीपर्यंतचा महामार्ग बनविला. त्या बदल्यात आय़आऱबी, सोलापूर व एऩएच़ए़आय़ पी़आय़यु. यांनी तामलवाडी व येडशी येथे टोलनाका उभा केला़ सोलापूर ते येडशी हा मार्ग ७० ते ८० टक्के पूर्ण झाल्याची माहिती ट्रकचालकाने दिली. सोलापूर -पुणे हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्यामुळे सोलापूर ते पुणे हे सहा ते सात तासांचे अंतर आता वाहनधारक तीन ते साडेतीन तासांतच पूर्ण करू लागले आहेत़ त्यामुळे या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वरवडे, सावळेश्वरची मुदत २०३१ तर येडशीची २०४४ पर्यंत- सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग तयार करणाºया पुणे सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड व आय़ एल़ अ‍ॅण्ड एफ़एस. या कंपनीने भारत सरकारच्या रस्ते व विकास मंत्रालयासोबत ३० सप्टेंबर २००९ रोजी करार केला आहे. हा करार १९ आॅगस्ट २०३१ रोजी संपणार आहे़ तोपर्यंत टोल वसुली ही सुरूच राहणार असल्याची माहिती टोल कंपनीचे प्रमुख प्रकाशकुमार लाल दास यांनी दिली़ - सोलापूर-येडशी हा महामार्ग पूर्ण केलेल्या आय़ आऱ बी. कंपनीने भारत सरकारच्या रस्ते व विकास मंत्रालयासोबत ३ मार्च २०१४ रोजी करार केला आहे़ या करारानुसार या मार्गावर टोल सुरू करण्यात आला. ही टोल वसुली २७ मार्च २०४४ पर्यंत असणार आहे.

वाढत्या वाहनांच्या किमती व वाढते इंधनाचे दर यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत़ त्यात आता टोलच्या वाढीव दराने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे़ भाडे परवडत नसल्याने बहुतांश गाड्या चार ते सहा दिवस सोलापुरातच थांबून राहतात़ टोलवाढीमुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे़- फारुख शेख,ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक

टॅग्स :Solapurसोलापूरhighwayमहामार्गtollplazaटोलनाकाroad transportरस्ते वाहतूक