शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

सावळेश्वर, वरवडे, तामलवाडी, येडशी टोलनाक्यांवरील टोल वाढला

By appasaheb.patil | Updated: April 2, 2019 18:40 IST

१ एप्रिलपासून झाली अंमलबजावणी : सावळेश्वर, वरवडे, तामलवाडी, येडशी टोलनाक्यांवर दर आकारणी

ठळक मुद्दे आता वाहनधारकांना ५ ते १५ रुपये अधिकचा टोल द्यावा लागणारवाढत्या वाहनांच्या किमती व वाढते इंधनाचे दर यामुळे वाहनधारक त्रस्त सोलापूर -पुणे हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्यामुळे सोलापूर ते पुणे हे सहा ते सात तासांचे अंतर आता वाहनधारक तीन ते साडेतीन तासांतच पूर्ण करू लागले

सोलापूर : आय़ एल़ अ‍ॅण्ड एफ़एस., पुणे-सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड व आयआरबीने आता कंत्राटातील नियमांचा आधार घेत वाढीव दराची १ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील तामलवाडी, वरवडे तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी व येडशी टोलनाक्यांवर आता वाहनधारकांना ५ ते १५ रुपये अधिकचा टोल देऊन प्रवास करावा लागणार आहे़ या वाढीव टोलमुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने पुणे-सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड व आय़ एल़ अ‍ॅण्ड एफ़ एस. ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड या दोन कंपन्यांची स्वत:ची गुंतवणूक करून सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग तयार केला. त्यानंतर गुंतवणूक केलेल्या पैशाची परतफेड करण्यासाठी  वरवडे (ता़ माढा) व सावळेश्वर (ता़ मोहोळ) या दोन्ही ठिकाणी टोलनाका उभारला.

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील सोलापूर ते येडशीपर्यंतचा महामार्ग बनविला. त्या बदल्यात आय़आऱबी, सोलापूर व एऩएच़ए़आय़ पी़आय़यु. यांनी तामलवाडी व येडशी येथे टोलनाका उभा केला़ सोलापूर ते येडशी हा मार्ग ७० ते ८० टक्के पूर्ण झाल्याची माहिती ट्रकचालकाने दिली. सोलापूर -पुणे हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्यामुळे सोलापूर ते पुणे हे सहा ते सात तासांचे अंतर आता वाहनधारक तीन ते साडेतीन तासांतच पूर्ण करू लागले आहेत़ त्यामुळे या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वरवडे, सावळेश्वरची मुदत २०३१ तर येडशीची २०४४ पर्यंत- सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग तयार करणाºया पुणे सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड व आय़ एल़ अ‍ॅण्ड एफ़एस. या कंपनीने भारत सरकारच्या रस्ते व विकास मंत्रालयासोबत ३० सप्टेंबर २००९ रोजी करार केला आहे. हा करार १९ आॅगस्ट २०३१ रोजी संपणार आहे़ तोपर्यंत टोल वसुली ही सुरूच राहणार असल्याची माहिती टोल कंपनीचे प्रमुख प्रकाशकुमार लाल दास यांनी दिली़ - सोलापूर-येडशी हा महामार्ग पूर्ण केलेल्या आय़ आऱ बी. कंपनीने भारत सरकारच्या रस्ते व विकास मंत्रालयासोबत ३ मार्च २०१४ रोजी करार केला आहे़ या करारानुसार या मार्गावर टोल सुरू करण्यात आला. ही टोल वसुली २७ मार्च २०४४ पर्यंत असणार आहे.

वाढत्या वाहनांच्या किमती व वाढते इंधनाचे दर यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत़ त्यात आता टोलच्या वाढीव दराने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे़ भाडे परवडत नसल्याने बहुतांश गाड्या चार ते सहा दिवस सोलापुरातच थांबून राहतात़ टोलवाढीमुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे़- फारुख शेख,ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक

टॅग्स :Solapurसोलापूरhighwayमहामार्गtollplazaटोलनाकाroad transportरस्ते वाहतूक