शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

आजची संवाद व्यवस्थाच धोक्यात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 13:19 IST

आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात माणसं स्वमग्न होत चालली आहेत. कुठेही सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जा. तुम्हाला माणसं व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकमध्ये गुंतलेली दिसतातच.

ठळक मुद्देआज निराशा, ताणतणाव, अनावर राग, व्यसनाधिनता यासारख्या समस्या डोके वर काढताना दिसतात पैशामागे धावताना हातातलं काही महत्त्वाचं निसटून जातंय का याचंही भान गरजेचं आहे

शहरातलं एक सुखवस्तू जोडपं. नवरा-बायको दोघेही जॉबला. सुरुवातीला नवरा नोकरी करायचा. पण पुढे बायकोलाही वाटू लागलं की, आपणही काहीतरी करावं. संसाराला हातभार लावावा. या विचाराने तिनेही स्वत:ला गुंतवून घेतलं. दाम्पत्याला दोन मुले. मुलगा थोरला. मुलगी धाकटी. घर नेहमी गतिमान. प्रत्येकजण व्यस्त. सर्वांची एकत्र भेट फक्त रात्रीच्या जेवणालाच. एकमेकांत संवाद कसला नाहीच आणि अचानक एकेदिवशी मुलगा काहीही न सांगता घरातून निघून जातो. खूप शोध घेतला जातो. मित्रांना, शिक्षकांना फोन. पण कुणालाच कसलीच खबर नाही. हतबल होऊन नवरा-बायको पोलीस स्टेशन गाठतात. तक्रार नोंदवली जाते. तपास चालूच राहतो. घरातला एकुलता एक मुलगा अचानक गायब होतो ही गोष्टच दाम्पत्याला सहन होत नाही. खूप विचार केल्यानंतर मग हळूहळू त्यांना कळतं की, आपण त्याच्याशी फारसं बोलतच नव्हतो. मग त्याच्या मनातलं आपल्याला कसं कळणार? संवाद साधायला हवा होता. पण आता वेळ निघून गेली.

ही आजच्या काळाची प्रातिनिधिक घटना आहे. अशा अनेक घटना रोज घडताहेत. केवळ शहरातच नाही तर खेड्यातसुद्धा. घरं ही केवळ निवासस्थानापुरती उरलीत की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती. घर ही केवळ एक इमारत नसते. ती जिवंत माणसांची एक कौटुंबिक व्यवस्था असते. या व्यवस्थेत प्रेम असतं. आपुलकी असते, जिव्हाळा असतो आणि मुख्य म्हणजे संवाद असतो.

संवाद ही निसर्गाने मानवाला दिलेली एक देणगी आहे. इतर पशुपक्षीही एकमेकांशी संवाद साधतात. पण माणसाचा संवाद मात्र याहून फारच वेगळा आणि उन्नत आहे. तो शब्द संवाद आहे. आपल्या मनातल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य या संवादात आहे. म्हणून तर आपल्या प्राचीन वाङ्मयातही संवाद आहेत. एकमेकांची दु:खं, वेदना विरघळून टाकण्याचं कसब संवादात असतं. म्हणून संवाद करावा. मंगेश पाडगावकरांच्या फार सुंदर ओळी आहेत :

मन मोकळं अगदी मोकळं करायचंपाखरु होऊन पाखराशी बोलायचं.

आज ही संवाद व्यवस्थाच धोक्यात येताना मला दिसत आहे. आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात माणसं स्वमग्न होत चालली आहेत. कुठेही सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जा. तुम्हाला माणसं व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकमध्ये गुंतलेली दिसतातच. मागच्या महिन्यात मी काही कार्यक्रमानिमित्त एका पाहुण्यांकडे गेलो होतो. घरात लांबून आलेल्या पाहुण्यांची वर्दळ होती. पण प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. आलेल्या नातेवाईकांशी ओळख करून घेण्यात कुणालाच रस नव्हता. मला प्रश्न पडला, जिवंत माणसांशी संवाद साधण्यातला नैसर्गिक आनंद सोशल मीडियावर चोवीस घंटे पडून राहून मिळत असेल का? कुठेतरी एक कविता मी वाचली होती. त्या कवितेमधला कवी अस्वस्थ असतो. कारण त्याच्या शेजारी राहणाºया त्याच्या मित्राचे वडील वारल्याची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचलेली असते. त्याला मित्राचे सांत्वन करायचे असते. पण त्याचा ईमेल आयडी जवळ नसल्याचं त्याला दु:ख असतं. म्हणजे शेजारी राहणाºया मित्राचे सांत्वनही आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून करणार. किती करंटेपणा हा ! पण हे आजचं वास्तव आहे.

पैसा जगण्यासाठी आवश्यक आहे. पण त्याच्यामागे किती धावायचं याचं एक तारतम्य असायला हवं. पैशामागे धावताना हातातलं काही महत्त्वाचं निसटून जातंय का याचंही भान गरजेचं आहे. कुटुंबात आपण कमावतो कशासाठी? कुटुंबातील सर्व सदस्य सुखी राहावेत यासाठीच ना? मग त्यासाठी फक्त पैसाच गरजेचा नाही तर संवाद देखील हवा आहे. आपल्याला भूक लागते. तशी मनाला देखील भूक लागते. संवादाची. ती नाही भागली तर मग विसंवाद निर्माण होतो. म्हणून आपण आपल्या आई-वडिलांशी, पत्नीबरोबर, मुलांबरोबर मोकळेपणाने बोलायला हवं. संवाद करायला हवा. त्यांचं मत, त्यांचे विचार, त्यांच्या वेदना समजून घ्यायला हव्यात. आज निराशा, ताणतणाव, अनावर राग, व्यसनाधिनता यासारख्या समस्या डोके वर काढताना दिसतात. या सर्वांवर एकच प्रभावी औषध आहे. ते म्हणजे संवाद !तेव्हा संवादरत व्हा.... !डॉ. प्रेमनाथ रामदासी, अकलूज(लेखक हे शिक्षक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरMobileमोबाइलInternetइंटरनेट