शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

एकुलत्या एक तरण्याबांड लेकरांच्या अकाली मृत्यूनंतर तीन कुटुंबं एकत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:17 IST

अपघातास वर्ष पूर्ण :  आसबे, माळगे अन् गुमडेल करणार जागृती; ‘आमची मुलं गेली.. तुमची जाऊ देऊ नका’

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : १९ नोव्हेंबर २०१७ ची ती पहाट... तुळजापूर रस्त्यावरील अपघातात एकलुते एक अशी तीन मुलं काळाच्या पडद्याआड गेली... तशी तिन्ही मुलांचा जबरदस्त दोस्ताना. या तीन तरण्याबांड लेकरांचं अकाली जाण्यानं समदु:खी माळगे, गुमडेल अन् आसबे ही कुटुंबे एकत्र आली आहेत. स्वत:च्या दु:खावर फुंकर घालीत हे तीन मित्र जणू सख्ख्या भावासारखे आज वावरताना दिसतात. ‘आमची मुलं गेली... तुमची जाऊ देऊ नका’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून ‘त्या’ लेकरांना खºया अर्थाने श्रद्धांजली असेल, अशा भावना मडोळप्पा नागेश माळगे, जयंत विजयकुमार गुमडेल आणि विजय चांगदेव आसबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. 

संगमेश (विनू) मडोळप्पा माळगे, दीपक जयंत गुमडेल आणि अक्षय विजय आसबे ही तीन मुले नागेश करजगी आर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बी. ई. मेकॅनिक या तृतीय वर्षात शिकत होती. अभ्यासातच नव्हे तर कॉलेजच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्येही तिघे सरसच होती. काळाला ते पाहावले नाही आणि १९ नोव्हेंबर २०१७ ची पहाट त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. जशी तिघांची मैत्री तशी त्यांच्या एकमेकांच्या पित्याची ओळख ना पाळख. मात्र घटनेच्या महिनाभरानंतर तिघे समदु:खी पिता एकत्र आले. केवळ हे तिघेच नव्हे तर तिघांच्या कुटुंबातील सदस्यही एकमेकांचे दु:ख दूर सारण्यासाठी अगदी समरस होऊन गेले आहेत. अगदी हाताला आलेली... उद्या परवा आपलं आधारवड बनणारी आपली लेकरं गेली तर आता आपल्या मुलीलाच मुलगा मानलाय या शब्दात माळगे, गुमडेल, आसबे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 

वर्षभर ना सण, ना उत्सव

  • - लेकरांच्या जाण्यानं तिन्ही कुटुंबातील सदस्य आजही दु:खाच्या छायेखाली आहेत. सण, उत्सवासारख्या आनंदालाही त्यांनी दूर केलं. पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेली ही लेकरं देवाघरी गेली असली तरी केवळ त्यांच्या आठवणींवरच एकेक दिवस कंठीत असतो, अशा भावना व्यक्त करताना माळगे, गुमडेल, आसबे यांच्या नेत्रांमधून अश्रूही टपकत होते. 

मुलांचे सवंगडीच हीच आता आमची मुलं...

  • - एखादा मित्र गेला तर त्याचा दुसरा मित्र काही दिवसांनी दूर जातो. इथे मात्र संगमेश माळगे, दीपक गुमडेल आणि अक्षय आसबे यांच्याशी साथसंगत करणाºया मित्रांचं आजही आमच्या घरी येणं-जाणं आहे. रघू मेतन, शुभम वारद, फताटे, हेमंत थळंगे, शिवप्रसाद मठ, शरद आनंदकर, गणेश बत्तूल, अक्षय गिराम, धरणे या सवंगड्यांचं आमच्या घरी येणं म्हणजे कुठेतरी आमच्या लेकरांचं दु:ख विसरणं असेच म्हणता येईल. हीच मुलं आता आमची मुलं बनून राहिली आहेत. 

तर नोकरीचा राजीनामा दिला असता-माळगे

  • - मुलगा तृतीय वर्षात शिकत होता. त्याची हुशारी, कल्पकता पाहता अंतिम वर्ष झाल्यावर हमखास चांगल्या पगाराची नोकरीही मिळणार होती, असा आत्मविश्वासही होता. अंतिम वर्ष उत्तीर्ण झाल्यावर मी शिवशाहीतील नोकरीचा राजीनामा देणार होतो. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. आता मुलीसाठी मी नोकरी करीत राहणार असल्याचे मडोळप्पा माळगे बोलत होते. 
टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी