शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

एकुलत्या एक तरण्याबांड लेकरांच्या अकाली मृत्यूनंतर तीन कुटुंबं एकत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:17 IST

अपघातास वर्ष पूर्ण :  आसबे, माळगे अन् गुमडेल करणार जागृती; ‘आमची मुलं गेली.. तुमची जाऊ देऊ नका’

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : १९ नोव्हेंबर २०१७ ची ती पहाट... तुळजापूर रस्त्यावरील अपघातात एकलुते एक अशी तीन मुलं काळाच्या पडद्याआड गेली... तशी तिन्ही मुलांचा जबरदस्त दोस्ताना. या तीन तरण्याबांड लेकरांचं अकाली जाण्यानं समदु:खी माळगे, गुमडेल अन् आसबे ही कुटुंबे एकत्र आली आहेत. स्वत:च्या दु:खावर फुंकर घालीत हे तीन मित्र जणू सख्ख्या भावासारखे आज वावरताना दिसतात. ‘आमची मुलं गेली... तुमची जाऊ देऊ नका’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून ‘त्या’ लेकरांना खºया अर्थाने श्रद्धांजली असेल, अशा भावना मडोळप्पा नागेश माळगे, जयंत विजयकुमार गुमडेल आणि विजय चांगदेव आसबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. 

संगमेश (विनू) मडोळप्पा माळगे, दीपक जयंत गुमडेल आणि अक्षय विजय आसबे ही तीन मुले नागेश करजगी आर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बी. ई. मेकॅनिक या तृतीय वर्षात शिकत होती. अभ्यासातच नव्हे तर कॉलेजच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्येही तिघे सरसच होती. काळाला ते पाहावले नाही आणि १९ नोव्हेंबर २०१७ ची पहाट त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. जशी तिघांची मैत्री तशी त्यांच्या एकमेकांच्या पित्याची ओळख ना पाळख. मात्र घटनेच्या महिनाभरानंतर तिघे समदु:खी पिता एकत्र आले. केवळ हे तिघेच नव्हे तर तिघांच्या कुटुंबातील सदस्यही एकमेकांचे दु:ख दूर सारण्यासाठी अगदी समरस होऊन गेले आहेत. अगदी हाताला आलेली... उद्या परवा आपलं आधारवड बनणारी आपली लेकरं गेली तर आता आपल्या मुलीलाच मुलगा मानलाय या शब्दात माळगे, गुमडेल, आसबे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 

वर्षभर ना सण, ना उत्सव

  • - लेकरांच्या जाण्यानं तिन्ही कुटुंबातील सदस्य आजही दु:खाच्या छायेखाली आहेत. सण, उत्सवासारख्या आनंदालाही त्यांनी दूर केलं. पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेली ही लेकरं देवाघरी गेली असली तरी केवळ त्यांच्या आठवणींवरच एकेक दिवस कंठीत असतो, अशा भावना व्यक्त करताना माळगे, गुमडेल, आसबे यांच्या नेत्रांमधून अश्रूही टपकत होते. 

मुलांचे सवंगडीच हीच आता आमची मुलं...

  • - एखादा मित्र गेला तर त्याचा दुसरा मित्र काही दिवसांनी दूर जातो. इथे मात्र संगमेश माळगे, दीपक गुमडेल आणि अक्षय आसबे यांच्याशी साथसंगत करणाºया मित्रांचं आजही आमच्या घरी येणं-जाणं आहे. रघू मेतन, शुभम वारद, फताटे, हेमंत थळंगे, शिवप्रसाद मठ, शरद आनंदकर, गणेश बत्तूल, अक्षय गिराम, धरणे या सवंगड्यांचं आमच्या घरी येणं म्हणजे कुठेतरी आमच्या लेकरांचं दु:ख विसरणं असेच म्हणता येईल. हीच मुलं आता आमची मुलं बनून राहिली आहेत. 

तर नोकरीचा राजीनामा दिला असता-माळगे

  • - मुलगा तृतीय वर्षात शिकत होता. त्याची हुशारी, कल्पकता पाहता अंतिम वर्ष झाल्यावर हमखास चांगल्या पगाराची नोकरीही मिळणार होती, असा आत्मविश्वासही होता. अंतिम वर्ष उत्तीर्ण झाल्यावर मी शिवशाहीतील नोकरीचा राजीनामा देणार होतो. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. आता मुलीसाठी मी नोकरी करीत राहणार असल्याचे मडोळप्पा माळगे बोलत होते. 
टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी