शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

पवार, ठाकरेंकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही; राज्यात महायुती ४५  पार करणार: दानवेंना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 18:46 IST

रावसाहेब दानवे : पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे घेतले दर्शन

रविंद्र देशमुख  सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील यात कोणतीच शंका नाही. महाराष्ट्रातदेखील महायुती ४५ पेक्षा जास्त जागा जिंकेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा विश्वास आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही, असं विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी पंढरपुरात केले. दानवे रविवारी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, आ. समाधान आवताडे, सुभाष देशमुख, मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे उपस्थित होत्या.

ते म्हणाले, राजकारणात काही होऊ शकतं. आम्ही तर त्यांना पाठिंबा मागितलेला नाही. आम्हाला त्यांची गरज पडणार नाही. आमचे ४०० निवडून येणार हे सांगण्यासाठी कोणा भविष्यकाराची गरज नाही. देशात लोकशाही आहे. त्यामुळे मनोज जरांगे व त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. देशातील मतदारराजा हुशार आहे. विधानसभेला उभे राहिले तर त्यावेळेस लोक ठरवतील. जनता कोणाला पाठिंबा देते हे पाहावे लागेल असंही त्यांनी नमूद केले.

आरएसएस आणि भाजप कधीच वेगळं होऊ शकत नाही. आरएसएस आमची मातृसंस्था आहे. राजकारणात आम्हाला सल्ला देतील किंवा इंटरफेअर करतील, असे मुळीच नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Solapurसोलापूर