शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मराठ्यांना मागास ठरविणारे अनेक पुरावे आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:17 IST

लवकरच पडताळणी होणार असल्याची माहिती डॉ़  सर्जेराव निमसे यांनी माहिती दिली़

ठळक मुद्देनिजामाच्या काळातील पुरावा सादर करण्यात आला न्यायालयात टिकेल असा भरभक्कम अहवाल शासनाला लवकरच सादर करू

सोलापूर : मराठा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे अनेक पुरावे लोक दाखल करीत आहेत. मराठवाड्यात झालेल्या सुनावणीवेळी निजामाच्या काळातील पुरावा सादर करण्यात आला आहे. त्याची पडताळणी होईल, असे राज्य मागासवर्गीय आयोगाचे तज्ज्ञ सदस्य सर्जेराव निमसे यांनी सांगितले. न्यायालयात टिकेल असा भरभक्कम अहवाल आम्ही शासनाला लवकरच सादर करू, असेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी शासकीय विश्रामगृहात जनसुनावणी घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत  डॉ. निमसे म्हणाले, आयोगाने मराठवाडा, विदर्भातील सुनावणी पूर्ण केली आहे. ऐतिहासिक पुरावे, आकडेवारीच्या आधारे आम्ही सर्वंकष अहवाल सादर करणार आहोत.

मराठा आणि कुणबी समान असल्याचे पुरावे अनेक ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याची छाननी होईल. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या काही गावातील लोक एकमेकांचे नातेवाईक आहेत. विदर्भातील लोक कुणबी तर मराठवाड्यातील लोक मराठा आहेत. कुणबी समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश आहे, त्यामुळे मराठा समाजाचाही ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, यासाठी या लोकांनी एकत्र पुरावे सादर केले आहेत. राज्यातील पाच संस्थांच्या मदतीने सर्वेक्षण केले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सर्वेक्षण होईल. 

२०० वर्षांपूर्वीचा हंडा डॉ. निमसे म्हणाले, औरंगाबादमध्ये झालेल्या सुनावणीवेळी मराठा समाजाच्या नेत्यांनी २०० वर्षांपूर्वीचा भला मोठा हंडा ऐतिहासिक पुरावा म्हणून सादर केला. या हंड्यावर ‘औरंगाबाद कुणबी मराठा समाज’ असे लिहिलेले होते. यातून मराठा आणि कुणबी एकच आहेत, असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

पावसाळ्यापूर्वी अहवाल पूर्ण करू- आयोगाने अतिशय गांभीर्याने यासंदर्भात काम करीत आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व जिल्ह्यातील जनसुनावणी, सर्वेक्षण पूर्ण होईल. त्यानंतर लवकरच अहवाल सादर करू, असेही निमसे यांनी सांगितले. 

...पण जाहिरातबाजी करू नकामराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणी करताना आयोग केवळ मराठ्यांच्या नव्हे तर सर्व समाजाचे म्हणणे ऐकून घेत आहे. प्रत्येकाला निवेदन देण्याचा अधिकार आहे. कुणालाही अडविण्याचा अधिकार नाही. मुळातच हा विषय संवेदनशील बनला आहे. ज्यांना मराठा आरक्षणाविरोधात निवेदन द्यायचे त्यांनी द्यावे; पण बाहेर जाऊन जाहिरातबाजी करू नये, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरmarathaमराठा