शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

तर आत्महत्येची वेळ येईल; वाढत्या ऊस उत्पादनावरून गडकरींनी व्यक्त केली चिंता

By appasaheb.patil | Updated: April 25, 2022 13:21 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : साखर सरपल्स झाली आहे. ब्राझीलमध्ये साखर वाढली तर २२ रुपये साखरेचा भाव होईल. त्यावेळी मात्र उसाचे दर काही कमी करता येणार नाहीत. ऊसाच्या सायरपपासून इथेनॉल निर्मिती करा. नाहीतर ऊसाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास भविष्यात आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. वाढत्या ऊस उत्पादनावरून गडकरींनी यांनी सोलापुरात चिंता व्यक्त केली. 

सोलापुरात आयोजित नव्याने झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खा. जयसिध्देश्वर महास्वामी, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर याच्यासह अन्य आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, साखर घाट्यात जाणार आहे. त्यामुळे बगॅस वगैरेपासून हायड्रोजन निर्मित करायला सुरु करा.  कारखानदारी नुकसानमध्ये जाणारी आहे.  आपण साखर उत्पादनमध्ये जगात तिसऱ्या नंबर आहोत, असं गडकरी म्हणाले.  काही दिवसापूर्वी माझ्याकडे ब्राझीलचे शिष्टमंडळ आले होते.  त्यांच्याकडे दुष्काळ पडलाय म्हणून आज महाराष्ट्रातील साखरेला चांगला भाव मिळतोय. भविष्यात साखरेला भाव मिळणे कठीण होणार आहे, त्यामुळे आतापासूनच साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर भर द्या असेही आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेNitin Gadkariनितीन गडकरी