शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

रंगभूमी, तरूणाई अन् तालीम....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 16:57 IST

रंगभूमी ही कलाकारांची खºया अर्थाने कर्मभूमी असते. आपल्या आयुष्यातील दररोज काही वेळ कलाकाराला रंगभूमीसाठी सातत्याने द्यावे, असे वाटत असते ...

ठळक मुद्देमाणसाच्या, कलाकाराच्या सर्जनशीलता जोपासण्याचे काम रंगभूमी अव्याहतपणे, सतत करत असतेरंगभूमीची सेवा करत असताना मात्र कलाकाराला अनंत आणि असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते

रंगभूमी ही कलाकारांची खºया अर्थाने कर्मभूमी असते. आपल्या आयुष्यातील दररोज काही वेळ कलाकाराला रंगभूमीसाठी सातत्याने द्यावे, असे वाटत असते आणि तो कलाकार तसा वेळ देत देत रंगभूमीची अखंडपणे, अव्याहतपणे सेवा करत जगत असतो. सच्चा निष्ठावंत कलाकाराची कामकाज ही ‘उपजीविका’ असते. परंतु, रंगभूमीची सेवा करत असताना मात्र कलाकाराला अनंत आणि असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. समस्यांची ही मालिका कधी कधी अखंड असते, संपता संपत नाही आणि याच समस्यांमधून जन्म घेत असते एक ‘नवनिर्मिती’ ! माणसाच्या, कलाकाराच्या सर्जनशीलता जोपासण्याचे काम रंगभूमी अव्याहतपणे, सतत करत असते, हे निर्विवाद आहे !

पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी नाटक आणि रंगभूमी यासाठी कार्य करणारे अत्यंत उपक्रमशील असे कलाकार तयार होत असतात. अनेक कार्यशाळांमधून, शिबिरांमधून असे कलाकार घडविण्याचे कार्य चालू असते. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी या रंगभूमीला पोषक असे वातावरण असल्याचे नेहमीच वाटत असते. परंतु, ज्यावेळी आपण रंगभूमीचा इतिहास धुंडाळतो त्यावेळी जाणवते की त्याठिकाणी आलेली ही समृद्धी काही एका रात्रीतून आलेली नाही. त्या ठिकाणच्या, त्यावेळच्या अनेक दिग्दर्शक,कलाकार, निर्माते यांनाही अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले होते. नाटकसंहिता लिखाणापासून ते रंगभूमीवर सादर करणे इथपर्यंत दीर्घ टीमवर्क असल्याचे मान्य करावे लागते. एकमेकांच्या सहकार्याने, मदतीने आणि सर्वांमध्ये असलेल्या रंगभूमीवरील ‘निष्ठेने’ नाट्यनिर्मिती घडत असते.

रंगभूमीवरील ‘निष्ठा’ हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आजकाल कलाकारांच्या वर्तनाकडे पाहता थोडेसे नैराश्य येते. नाट्यनिर्मिती ही प्रदीर्घ अशी प्रणाली आहे. या प्रदीर्घ प्रणालीमध्ये पाठांतर, तालमी यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. किंबहुना, या दोन्ही गोष्टी अपरिहार्य आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नेमक्या याच गोष्टींना आजची तरुणाई बगल देताना दिसून येते. आज समाजात वाढलेल्या अनेक माध्यमांचा प्रभाव त्यांच्यावर झालेला असल्याचे जाणवते.

‘पी हळद अन् हो गोरी’ असे आजच्या तरुणाईला, कुठलीही गोष्ट पटकन घडावी असेच वाटत असते. त्यामुळे होते काय की पाठांतर आणि तालमी यांच्या अभावामुळे निर्माण होत असलेली कलाकृती ही तेवढी दर्जेदार नसते. दर्जेदार कलाकृतींसाठी संहिता, त्यातील आशय, त्याची मांडणी, कलाकारांचे योगदान, तांत्रिक गोष्टींचा योग्य वापर या सर्वच्या सर्व बाबी या अत्यंत विचारपूर्वक योजाव्या लागतात. त्यासाठी आपल्या तरुणाईने जास्तीत जास्त अभ्यास, कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास उत्कृष्ट नाट्यनिर्मिती होण्याला वेळ लागणार नाही.

तरुणाईने सर्वात प्रथम रंगभूमीवर प्रेम करणे आवश्यक आहे. कुठल्याही अडीअडचणीतून मार्ग काढण्याची तत्परता अंगात वागवणे आवश्यक आहे. अनेक उत्तमोत्तम विषय आज नाट्यलेखकांना सापडत आहेत. तसे काही लेखक लेखन करतानाही दिसून येत आहेत. अशा उत्कृष्ट नाट्यसंहितेला न्याय देण्याचे काम मात्र दिग्दर्शकाला आणि त्यात काम करणाºया कलाकाराला करावे लागेल. त्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास, भूमिकेची समज, अवलोकन, अनुसरण आणि तालीम या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे.

‘प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट’ असे म्हटले जाते, ते उगाच नाही. म्हणूनच नाटकाची प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे. आजच्या तरुणाईला प्रॅक्टिस ही प्रोसेस खूप कंटाळवाणी वाटत असते. परंतु, या गोष्टीला ‘शॉर्टकट’ कुठेच नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. शेवटी काय अभ्यास, आकलन, अनुभव, अनुसरण या सर्व गोष्टी नाटकासाठी अत्यंत आवश्यक आहेत़- नागेंद्र माणेकरी(लेखक हे एक नाट्यलेखक व दिग्दर्शक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरmusicसंगीत