शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

तांबवे ग्रामस्थांनी घेतला १३ दिवसांऐवजी पाच दिवस दुखवटा पाळण्याचा निर्णय

By दिपक दुपारगुडे | Published: April 21, 2023 2:32 PM

येणाऱ्या ग्रामसभेत ठराव पारित करण्यात येणार

दीपक दुपारगुडे, सोलापूर: तांबवे (टें) (ता. माढा) गावातील माणिक कोंडिबा खटके-पाटील यांच्या निधनानंतर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ खटके व त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत पाच दिवसांचे सुतक व दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण गावानेच आता गावातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहा किंवा तेरा दिवसांचा दुखवटा न पाळता फक्त पाच दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या ग्रामसभेत ठरावही पारित करण्यात येणार आहे.

१५ एप्रिल रोजी माणिक कोंडिंबा खटके-पाटील यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुली व नातवंड असा परिवार आहे. तांबवे गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ खटके- पाटील यांचे ते चुलते तर नितीन खटके-पाटील यांचे आजोबा होत. १७ एप्रिल रोजी तिसऱ्या दिवसाचा अर्थात सावडण्याचा विधी पार पडला. यावेळी कै. माणिक कोंडिबा खटके-पाटील यांच्या कुटुंबीयांनी व नागनाथ खटके-पाटील यांनी दहा दिवसांऐवजी पाच दिवसांचे सुतक अथवा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला. यानंतर तांबवे गावातील सर्व प्रमुख मंडळींनी एकत्रित येऊन यापुढे गावातील कोणत्याही कुटुंबातील व्यक्ती दुर्दैवाने मयत झाल्यास दहाव्या दिवशीच्या विधीचा किंवा सुतकाचा कालावधी कमी करून पाच दिवसांचा करण्याचे ठरले आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत