शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

पाण्यातील ऑक्सिजनची पातळी झाली कमी; हवेतील श्वास घेण्यासाठी मासे किनाऱ्यावर

By शीतलकुमार कांबळे | Updated: June 5, 2024 19:20 IST

मागील काही दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसाचे पाणी तलावात मिसळल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली.

सोलापूर : श्री सिद्धेश्वर तलावातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली आहे. यामुळे तलावातील माश्याना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. म्हणून मासे तलावाच्या किनाऱ्यावर येऊन श्वास घेत आहेत.

मागील काही दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसाचे पाणी तलावात मिसळल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली. यासोबतच वीज जेव्हा कडाडते त्यामुळे हवेतील नायट्रोजन विरघळून नायट्रिक बनते. हे नायट्रिक पावसाच्या थेंबासोबत जमिनीवर येते. सगळीकडून आलेले पाणी तलावात मिसळते. त्यामुळे तलावातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

कमी जागेत जास्त मासे असल्यास त्यांना ऑक्सिजनची अधिक गरज पडते. पावसाचे प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे आणखी ऑक्सिजन कमी होते. पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने मासे श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर तोंड काढत असल्याचे दिसून आले. २७ मे रोजी प्रदूषित पाण्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले.

प्रदूषणाची व्हावी तपासणी

शहरात ज्याप्रमाणे हवा व ध्वनीच्या प्रदूषणाच्या पातळीची तपासणी होते, त्याचप्रमाणे तलावातील पाण्याची तपासणी व्हावी यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रदूषणाची तपासणी केल्यानंतर ते कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेला सांगावे. महापालिकेने तलावाचे सुशोभीकरण करण्याऐवजी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे, मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरFishermanमच्छीमारRainपाऊस