शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पाण्यातील ऑक्सिजनची पातळी झाली कमी; हवेतील श्वास घेण्यासाठी मासे किनाऱ्यावर

By शीतलकुमार कांबळे | Updated: June 5, 2024 19:20 IST

मागील काही दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसाचे पाणी तलावात मिसळल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली.

सोलापूर : श्री सिद्धेश्वर तलावातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली आहे. यामुळे तलावातील माश्याना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. म्हणून मासे तलावाच्या किनाऱ्यावर येऊन श्वास घेत आहेत.

मागील काही दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसाचे पाणी तलावात मिसळल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली. यासोबतच वीज जेव्हा कडाडते त्यामुळे हवेतील नायट्रोजन विरघळून नायट्रिक बनते. हे नायट्रिक पावसाच्या थेंबासोबत जमिनीवर येते. सगळीकडून आलेले पाणी तलावात मिसळते. त्यामुळे तलावातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

कमी जागेत जास्त मासे असल्यास त्यांना ऑक्सिजनची अधिक गरज पडते. पावसाचे प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे आणखी ऑक्सिजन कमी होते. पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने मासे श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर तोंड काढत असल्याचे दिसून आले. २७ मे रोजी प्रदूषित पाण्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले.

प्रदूषणाची व्हावी तपासणी

शहरात ज्याप्रमाणे हवा व ध्वनीच्या प्रदूषणाच्या पातळीची तपासणी होते, त्याचप्रमाणे तलावातील पाण्याची तपासणी व्हावी यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रदूषणाची तपासणी केल्यानंतर ते कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेला सांगावे. महापालिकेने तलावाचे सुशोभीकरण करण्याऐवजी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे, मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरFishermanमच्छीमारRainपाऊस