शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

उडगीत कर्नाटक राज्याचा ध्वज फडकविला, जय हो कर्नाटकचा नारा; महाराष्ट्रात सुविधा नसल्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 16:02 IST

ग्रामस्थांनी कर्नाटकाचे झेंडे हातात घेऊन जय कर्नाटकच्या घोषणा देत महाराष्ट्र शासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केले.

अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील २३ गावोपाठोपाठ उडगी येथील नागरिक कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव घेण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी ग्रामस्थांनी कर्नाटकाचे झेंडे हातात घेऊन जय कर्नाटकच्या घोषणा देत महाराष्ट्र शासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केले.

कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह जत तालुक्यातील काही गावांवर दावा केल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये सीमावाद वाढला आहे.

कर्नाटक व महाराष्ट्र सीमाभागातील नागरिकांना महाराष्ट्र सरकारने उजनीचे पाणी देतो म्हणून गेली ४० वर्षांपासून राजकारण करीत आहे. उजनी पाण्याचे गाजर दाखविण्याचे काम  येथील लोकप्रतिनिधी केले आहे.महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील भागातील वंचित गावांना झुलवत ठेवले आहे.शेतकऱ्यांचा फक्त मतदानासाठी वापर करुन घेतला आहे. कर्नाटकात कोणतेही सरकार आले तर शेतकऱ्यांना सोईसुविधा मिळतात.

सीमाभागातील नागरिकांना महाराष्ट्र सरकार कोणतेही सुविधा देत नाहीत, अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामधून जनतेतून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उडगी हे महाराष्ट्रात असून येथील उच्च शिक्षण घेण्यासाठी सोलापूर, पुणे,मुबंईला जावे लागते.त्यामुळे भाषेची अडचण येते.

कर्नाटक व महाराष्ट्र सीमाभागातील नागरिकांना वीज, पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, युवकांना रोजगार यापासून वंचित राहावे लागत आहे. या उलट कर्नाटक राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज, उसाला वाढीव दर, शेतीसाठी पाणी, हमी भाव,खते, बियाणे,शेतीसाठी अवजारे, डिझेल-पेट्रोल इत्यादी माफक दरात उपलब्ध करून दिली जाते, असे वेळी नागरिकांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी सुरेश माडयाळ, महादेव येळमेली, श्रीकांत कोळी, सोमु आलूरे, रमेश भांड, धुळप्पा जिगजंबगी, विशाल प्याटी, कल्लप्पा कामा,शालेश मकानदार, सुरेश हदपद, उमेश, कोळी, शरणू, कोळी, शरणप्पा कुंभार, देवेंद्र नारायणकर, नागप्पा म्हेत्रे इत्यादी उपस्थित होते. "महाराष्ट्र राज्य सरकारने १५ व्या वित्तआयोगातून ग्रामपंचायत मिळणारा ५० ते ६० निधी कपात  केल्याने परिणामी गावाचा विकास कसा होणार.जल जीवन मिशन मार्च मध्ये मंजूर मिळाली आहे.अद्यापही या कामाला सुरुवात झाली नाही. आरोग्य उपकेंद्रा मध्ये औषधांचा तुटवडा असल्याचे यापूर्वी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कानावर घालून सुद्धा अजून तरी औषधे उपलब्ध झाली नाहीत. अश्या छोट्या मोठ्या गोष्टींचा वांरोवार पाठपुरावा करावा लागतो. वेळेत राज्य शासनाकडून भौतिक सुविधा पूर्ण क्षमतेने मिळत नाहीत असे अनेक प्रश्न आहेत.मात्र ते सुटत नाहीत.त्यामुळे आम्ही कर्नाटकात जाण्यास इच्छुक आहोत."

-लक्ष्मीबाई म्हेत्रे, सरपंच, उडगी 

टॅग्स :Solapurसोलापूरakkalkot-acअक्कलकोटKarnatakकर्नाटक