शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
4
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
5
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
6
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
7
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
8
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
9
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
10
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
11
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
12
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
13
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
14
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
15
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
16
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
17
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
20
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

उडगीत कर्नाटक राज्याचा ध्वज फडकविला, जय हो कर्नाटकचा नारा; महाराष्ट्रात सुविधा नसल्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 16:02 IST

ग्रामस्थांनी कर्नाटकाचे झेंडे हातात घेऊन जय कर्नाटकच्या घोषणा देत महाराष्ट्र शासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केले.

अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील २३ गावोपाठोपाठ उडगी येथील नागरिक कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव घेण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी ग्रामस्थांनी कर्नाटकाचे झेंडे हातात घेऊन जय कर्नाटकच्या घोषणा देत महाराष्ट्र शासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केले.

कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह जत तालुक्यातील काही गावांवर दावा केल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये सीमावाद वाढला आहे.

कर्नाटक व महाराष्ट्र सीमाभागातील नागरिकांना महाराष्ट्र सरकारने उजनीचे पाणी देतो म्हणून गेली ४० वर्षांपासून राजकारण करीत आहे. उजनी पाण्याचे गाजर दाखविण्याचे काम  येथील लोकप्रतिनिधी केले आहे.महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील भागातील वंचित गावांना झुलवत ठेवले आहे.शेतकऱ्यांचा फक्त मतदानासाठी वापर करुन घेतला आहे. कर्नाटकात कोणतेही सरकार आले तर शेतकऱ्यांना सोईसुविधा मिळतात.

सीमाभागातील नागरिकांना महाराष्ट्र सरकार कोणतेही सुविधा देत नाहीत, अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामधून जनतेतून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उडगी हे महाराष्ट्रात असून येथील उच्च शिक्षण घेण्यासाठी सोलापूर, पुणे,मुबंईला जावे लागते.त्यामुळे भाषेची अडचण येते.

कर्नाटक व महाराष्ट्र सीमाभागातील नागरिकांना वीज, पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, युवकांना रोजगार यापासून वंचित राहावे लागत आहे. या उलट कर्नाटक राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज, उसाला वाढीव दर, शेतीसाठी पाणी, हमी भाव,खते, बियाणे,शेतीसाठी अवजारे, डिझेल-पेट्रोल इत्यादी माफक दरात उपलब्ध करून दिली जाते, असे वेळी नागरिकांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी सुरेश माडयाळ, महादेव येळमेली, श्रीकांत कोळी, सोमु आलूरे, रमेश भांड, धुळप्पा जिगजंबगी, विशाल प्याटी, कल्लप्पा कामा,शालेश मकानदार, सुरेश हदपद, उमेश, कोळी, शरणू, कोळी, शरणप्पा कुंभार, देवेंद्र नारायणकर, नागप्पा म्हेत्रे इत्यादी उपस्थित होते. "महाराष्ट्र राज्य सरकारने १५ व्या वित्तआयोगातून ग्रामपंचायत मिळणारा ५० ते ६० निधी कपात  केल्याने परिणामी गावाचा विकास कसा होणार.जल जीवन मिशन मार्च मध्ये मंजूर मिळाली आहे.अद्यापही या कामाला सुरुवात झाली नाही. आरोग्य उपकेंद्रा मध्ये औषधांचा तुटवडा असल्याचे यापूर्वी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कानावर घालून सुद्धा अजून तरी औषधे उपलब्ध झाली नाहीत. अश्या छोट्या मोठ्या गोष्टींचा वांरोवार पाठपुरावा करावा लागतो. वेळेत राज्य शासनाकडून भौतिक सुविधा पूर्ण क्षमतेने मिळत नाहीत असे अनेक प्रश्न आहेत.मात्र ते सुटत नाहीत.त्यामुळे आम्ही कर्नाटकात जाण्यास इच्छुक आहोत."

-लक्ष्मीबाई म्हेत्रे, सरपंच, उडगी 

टॅग्स :Solapurसोलापूरakkalkot-acअक्कलकोटKarnatakकर्नाटक