शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

चांगली बातमी; कोरोनामुक्त झाल्यानंतर आता ते व्यायामात मग्न...! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 13:06 IST

सोलापुरातील टेक्स्टाईल कर्मचाऱ्याची कोरोनावर मात;  रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी महिन्यात करून किरकोळ आजार आहे घाबरायचं नाही

ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : छातीत दुखत असल्याने गवळी वस्ती येथील एक नागरिक शासकीय रुग्णालयात ॲडमिट झाले. त्यांची 'कोरोना' टेस्ट करण्यात आली. ते पॉझिटिव्ह निघाले. पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आल्यानंतर सुरवातीला भीती वाटली पण नंतर भीती निघून गेली. रुग्णालयात उपचारानंतर आता ते पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. ते पुन्हा तंदुरूस्त बनले असून रोज पहाटे लवकर उठून जोर-बैठका, सूर्यनमस्कार तसेच शारीरिक कसरतीत रमले आहेत. ते गवळी वस्ती येथील रहिवासी असून ते या ४५ वर्षांचे आहेत. रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी दैनंदिन व्यायाम खूप गरजेचे आहे. नियमित चांगले व्यायाम करा आणि पोस्टीक जेवण घ्या असा सल्लाही ते आवर्जून देतात. 

'कोरोना'वर मात केल्यानंतर लोकमत'शी बोलताना ते म्हणाले, उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात सुरुवातीला त्रास झाला. पण हिंमतीने उपचाराला प्रतिसाद देत राहिलो. डॉक्टरांशी संवाद करत राहिलो. डॉक्टर काय सूचना देखील त्याचे पालन करत राहिलो. त्यामुळे मी लवकर कोरोना मुक्त झालो. टेक्स्टाईल कर्मचारी असून सध्या होम कोरंटाईन मध्ये आहेत. रोज पहाटे लवकर उठून घरासमोरील मोकळ्या जागेत ते नियमितपणे व्यायाम करतायेत. त्यांच्या या धाडसाचे तसेच समंजसपणाचे गवळी वस्ती परिसरात कौतुक होत आहे. त्यांच्या या धाडसातून प्रेरणा घेत बरे झालेले रुग्णही व्यायाम करत आहेत. नागनाथ सांगतात, कोरोना हा खूप सिम्पल आजार आहे. कोरोना आजाराला घाबरायचे काहीच आवश्यकता नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध-पाणी घेत जा. चिंतामुक्त रहा. काही दिवसातच तुम्ही कोरोना मुक्त व्हाल.

कोरोना बाधित रुग्ण औषध टाकून द्यायचे...

ते सांगतात, कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर सर्वप्रथम शासकीय रुग्णालयात दाखल केले. दहा दिवस शासकीय रुग्णालयात उपचार झाले. त्यानंतर कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये सहा दिवस उपचार झाले. उपचारादरम्यान डॉक्टर औषध (गोळ्या) द्यायचे, ते मी नियमितपणे घेत होतो. इतर पीडित रुग्ण औषध पूर्णपणे न घेता टाकून द्यायचे. मी त्यांना सांगत होतो की कोरोना मुक्त होण्यासाठी औषध पूर्णपणे घ्या. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या टाकून देऊ नका. पण लोक विचित्र वागत होते. त्यांनी कोरोनाची धास्ती घेतली होती. त्यामुळे ते औषध टाकून द्यायचे. ते चुकीचे आहे. लोकांनी तसे करू नये, असा मौलिक सल्लाही ते देतात.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याTextile Industryवस्त्रोद्योगCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस