शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

त्या काक स्पर्शाने अख्या गावाच्या डोळयातून अश्रुधारा; ब्रह्मपुरीतील अनाहूत घटनेची सर्वत्र चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 13:45 IST

सोलापूर लोकमत विशेष

मल्लिकार्जुन देशमुखे

मंगळवेढा : पिंडाला कावळा शिवतो म्हणजे नेमके काय असते ? याबाबत समाजात अनेक समज आहेत, मात्र मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे शनिवारी गावकऱ्यांना याबाबत असाच एक विलक्षण अनुभव पहिला मिळाला. गावातील सर्व समाजातील प्रमुख त्या घासाने भरलेल्या ताटाजवळ जातात, गावकऱ्यांच्यावतीने वचन दिले जाते अन् पाऊण तास दूर अंतरावरून फिरणारा कावळा काही क्षणात येऊन पटकन त्या गावकऱ्यांसमोरच घासाला स्पर्श करतो. अन् काय या घटनेने अख्ख्या गावाला रडू कोसळू लागते. ही अनाहूत घटना शनिवारी सकाळी  ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथे  घडली आहे.

ब्रह्मपुरी येथील श्री संत दामाजी साखर कारखाना चे माजी संचालक धनंजय पाटील यांचे गुरुवारी निधन झाले. त्याचा रक्षा विसर्जन कार्यक्रम शनिवारी ब्रह्मपुरी येथे होता त्यांच्या अकाली निधनाने गावात एकच शोककळा पसरली होती. पहिल्या मुलाच्या निधनाने दोन्ही मुलाला खूप जपणाऱ्या त्या मुलाचे छत्र हिरावल्याने सर्व गावकरी हळहळत होते. त्याच्या अस्थी पूजनांनतर विविध पदार्थांनी भरलेले ताट काक स्पर्शासाठी ठेवले होते. बराच वेळ झाला तरी कावळा त्या ताटा कडे फिरकला नाही दोन्ही मुलांनी आपल्या नातेवाईकांसोबत दर्शन घेतले.

कावळा ज़र पिंडाला शिवत नसेल तर काही इच्छा अपूर्ण असेल तर पुर्ण करू अशी क़बूली देतात. यासाठी दोन्ही मुलासह नातेवाईकांसह  सगळ्यांचे नमस्कार झाले तरी कावळा काही पिंडाला शिवेना...आप्तेष्ट, हितचिंतक आपापल्यापरिने सल्ले देऊ लागले. जेणेकरून कावळा पिंडाला शिवेल. तरीही कावळा काही शिवेना. सगळे बोलणे झाले होते. पण उपयोग होत नव्हता. दूर अंतरावर गिरक्या घेणारे कावळे जवळ यायचे नाव घेत नव्हते. हा प्रकार तब्बल पाऊण तास सुरू होता.

अखेर गावातील सर्व समाजातील प्रमुख व जेष्ठ व्यक्तींनी त्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन तुझ्या पश्चात दोन्ही मुलांना स्वतःच्या मुलाप्रमाणे नीट सांभाळू. त्यांना कधीही अंतर दिले जाणार नाही हे सामूहिक वचन दिले. अन काय तो चमत्कार झाला गेले पाऊण तास दूर अंतरावरून गिरकी घेणारे एक दोन नव्हे तर तब्बल चार कावळे क्षणात आले अन भरलेल्या ताटातील बरेचशे पदार्थ मनसोक खाल्ले. गावकऱ्यांच्या शब्दासाठी तासभर अडत धरलेला आत्मा तृप्त झाला. कावळयाचा ताटाला स्पर्श होताच उपस्थित अख्या गावाला, नातेवाईकांना अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यातून एकसाथ अश्रुधारा बरसू लागल्या. काक स्पर्शाचे अनेकजनांनी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे अनुभव घेतले मात्र हा काक स्पर्शाचा अनुभव विलक्षण होता. सर्व गावकऱ्यांना गावकऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देणारा होता. याची सर्वत्र एकच चर्चा होती.

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यूSugar factoryसाखर कारखाने