शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गोड बोला..ग़ुड बोला; गोड बोलण्यासाठी अंत:करणात प्रेम, आपुलकी असावी लागते : विजयकुमार देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 17:14 IST

भारतीय परंपरेत प्रत्येक सणाची वेगळी ओळख आहे. यात मकर संक्रांतीचा गोड बोलण्याचा संस्कार महत्त्वाचा आहे.  आपल्या जीवनाची वाटचाल नेहमी ...

ठळक मुद्देकोणताही बदल सकारात्मक नजरेने स्वीकारत पुढे जाण्याची सवय या संस्कारामुळे भाषिक संवाद होण्यासाठी गोड बोलणे ही व्यवहाराची गरज गोड बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल सकारात्मक भाव निर्माण होतात

भारतीय परंपरेत प्रत्येक सणाची वेगळी ओळख आहे. यात मकर संक्रांतीचा गोड बोलण्याचा संस्कार महत्त्वाचा आहे.  आपल्या जीवनाची वाटचाल नेहमी योग्य दिशेने होण्यासाठी सर्वांशी गोड बोलणे महत्त्वाचे आहे. इतरांशी सुसंवाद साधणे, त्यांच्याशी मधूर बोलण्यासाठी अंत:करणात मात्र प्रेम आणि आपुलकी असणे अतिशय महत्वाचे आहे.

कोणताही बदल सकारात्मक नजरेने स्वीकारत पुढे जाण्याची सवय या संस्कारामुळे होते. यातील भाषिक संवाद होण्यासाठी गोड बोलणे ही व्यवहाराची गरज असते. गोड बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल सकारात्मक भाव निर्माण होतात. कोणत्याही व्यवहारात काहीतरी देवाण-घेवाणीच्या गोष्टी असतात. व्यवहार आला की, त्याचबरोबर अडचणी ठरलेल्या असतात. यातून माणसाचे संवाद दुरावतात.

व्यवहारात आपण कुणाला तरी कळत-नकळत दुखावत असतो. पण जर त्यामध्येही सकारात्मकता ठेवेली तर व्यवहारही गोडीमध्येच होतो.  राजकारण्यांना तर सर्वांची कामे करावी लागतात, तरीही काम नाही झाले की कोणीतरी दुखावतोच. समोरचा कसाही वागला, बोलला तरी आपल्या अंत:करणात त्याच्याविषयी क्षमा, दया, अशी सद्भावनाच असावी, असे मी मानतो. त्यामुळे गोड बोलणे हे केवळ स्वार्थ किंवा भीतीपोटी असू नये. काहीवेळा सत्य सांगितल्यावर इतरांना वाईट वाटते. हे सांगणे आपल्या हृदयापासून आले तर तर त्यालाही बरे वाटेल, त्यासाठी संक्रांतीचा योग चांगला आहे. संक्रांत हा सण विशेषत: युवकांसाठी महत्त्वाचा आहे. तरूण वयात जोश असतो.   -विजयकुमार देशमुख, पालकमंत्री

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख