शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Akkalkot Swami Samarth: स्वामी समर्थांच्या भक्तांची फसवणूक; भक्त निवास बुकिंगच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 19:46 IST

Akkalkot Swami Samarth: अक्कलकोट येथील स्वामी समर्थ भक्त निवासाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

Akkalkot Swami Samarth: अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ महाराज हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दररोज हजारोंच्या संख्येने अक्कलकोटात भाविक स्वामींच्या दर्शनासाठी येत असतात. केवळ मुंबई, पुणे महाराष्ट्रातून नाही, तर परराज्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणावर अक्कलकोटला येत असतात. येथे आल्यावर राहण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी बुकिंग केले जाते. याचाच फायदा काहींनी उचलला. स्वामी समर्थ भक्त निवासाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत या सायबर गुन्हेगारांनी अनेक स्वामी भक्तांना फसवल्याची माहिती आहे. 

अक्कलकोटला आल्यानंतर राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी अनेक जण मंदिर आणि अन्नछत्र मंडळाच्या भक्त निवासाचा पर्याय निवडतात. दुसऱ्या जिल्ह्यातून येणारे भाविक इंटरनेटचा वापर करुन भक्त निवासाबद्दल माहिती सर्च करतात. याचाच गैरफायदा या सायबर गुन्हेगारांनी उचलला आणि भक्त निवासाच्या नावाने खोटी माहिती आणि फोन नंबर ऑनलाईन संकेतस्थळावर दिली. या फसव्या संकेतस्थळावर वटवृक्ष स्वामी महाराज भक्त निवासाचे फोटो आणि अन्यच कुठल्या तरी हॉटेल्सचे फोटो लावून लोकांना आकर्षित केले. यासोबत दिलेल्या मोबाईल नंबरवर भाविक बुकिंगसाठी संपर्क करायचे, त्यावेळी त्यांचे आधार कार्ड मागितले जायचे. तसेच आगाऊ रक्कम म्हणून पैसे पाठवयाला सांगितले जायचे. ऐनवेळी गैरसोय होऊ नये, म्हणून अनेक भाविकांनी ७०० ते १२०० रुपये या नंबरवर पाठवले आहेत. 

मंदिर प्रशासनाची पोलिसांकडे तक्रार, प्रकरण सायबर शाखेकडे वर्ग

या ऑनलाईन माहितीद्वारे भक्त निवास बुकिंग झाल्याचे समजून भाविक अक्कलकोटला पोहोचायचे, तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात यायचे. साधारण १५ ते २० भाविकांनी अशा पद्धतीने फसवणूक झाल्याची माहिती मंदिर प्रशासनाला कळवली. त्यानंतर मंदिर प्रशासनाने देखील यासंदर्भात लोकांकडून माहिती घेऊन अक्कलकोट पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अक्कलकोट पोलिसांनी ही तक्रार सायबर पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती आहे. मात्र, फसवणूक झालेल्या भाविकांची संख्या वाढू शकते, असे म्हटले जात आहे. शिवाय फसवणूक झालेल्या भाविकांना ऐनवेळी पर्यायी व्यवस्था शोधण्याचा मनस्ताप आणि भूर्दंड सहन करावा लागला. 

दरम्यान, अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीतर्फे भक्त निवास सुरु करण्यात आले. कोणीही गैरफायदा घेऊ नये आणि सर्वसामान्य भाविकांना सोय व्हावी यासाठी प्रशासनाने फोनद्वारे किंवा ऑनलाईन बुकिंग सुविधा सुरु केलेली नाही. जे भाविक आधी येतील त्यांना आधी रुम मिळेल हेच तत्व अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे भाविकांना सायबर गुन्हेगारांच्या भूलथापास बळी पडू नये असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :akkalkot-acअक्कलकोटSolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी