शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

‘स्वाभिमान’ निवडणूक रिंगणात असेल, पण कुठे अन् किती जागा हे नंतरच कळेल : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 14:33 IST

पंढरपूर : स्वाभिमान पक्ष आगामी निवडणूक लढविणार आहे़ मात्र किती जागा आणि कोणत्या ठिकाणच्या जागा हे नंतरच कळेल, असे ...

ठळक मुद्देनेत्यांनीही जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि जनतेने नेत्यावर विश्वास ठेवला पाहिजे - नारायण राणे शेतकरी हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे़ त्यांना सुखी ठेवणे हे सरकारचे काम - नारायण राणे

पंढरपूर : स्वाभिमान पक्ष आगामी निवडणूक लढविणार आहे़ मात्र किती जागा आणि कोणत्या ठिकाणच्या जागा हे नंतरच कळेल, असे सांगून खा़ नारायण राणे यांनी उत्सुकता कायम ठेवली आहे.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त वाडीकुरोली येथे आयोजित पुरस्कार वितरण व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आ़ भारत भालके, संयोजक सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, नीलम राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत, राजूबापू पाटील, माजी आ़ शहाजीबापू पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगदीश बाबर, नगरसेवक चेतन नरोटे, संतोष पाटील, प्रतिभादेवी पतसंस्थेचे उपाध्यक्ष शहाजी साळुंखे, विठ्ठलचे संचालक महादेव देठे, कॉँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नागेश फाटे, नारायण मोरे, सुरेश देठे आदी उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले, मी मुख्यमंत्री झालो, विविध खात्यांचे मंत्री होतो. लोकांची अहोरात्र कामे केली़ कोकणातून सहा वेळा निवडून आलो़ सातव्या वेळी पुन्हा निवडून येणार असे वाटत होते, मात्र पराभूत झालो. सुशीलकुमार शिंदे हे देखील राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनीही विविध खात्यांचे मंत्रीपद भूषविले़ इतकेच नाही तर केंद्रातही ऊर्जामंत्री, गृहमंत्री अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले़ जनतेची कामे करूनही आम्हाला पराभूत का व्हावं लागतं हो ? असा सवाल करीत नेत्यांनीही जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि जनतेने नेत्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असे खा. नारायण राणे यांनी सांगितले.

शेतकरी हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे़ त्यांना सुखी ठेवणे हे सरकारचे काम आहे, मग ते कोणत्याही पक्षाचे असो़ परंतु नेत्यांच्या आश्वासनाने आणि घोषणेने त्यांचे पोट भरत नाही तर कृती केली पाहिजे़ शेतकरी विकासाचा घटक आहे, मात्र त्यांना सध्या दुष्काळात हालअपेष्टा करायला लावणे चुकीचे आहे़ सरकारने चारा छावणी सुरू करण्यासाठी कोणत्याही नियम व अटीचे बंधन घालू नये़ जनावरांना चारा द्यायचाच असेल तर उदार मनाने द्यावे, असा सल्ला नारायण राणे यांनी सरकारला दिला. 

टॅग्स :SolapurसोलापूरNarayan Raneनारायण राणे Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक