शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमान’ निवडणूक रिंगणात असेल, पण कुठे अन् किती जागा हे नंतरच कळेल : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 14:33 IST

पंढरपूर : स्वाभिमान पक्ष आगामी निवडणूक लढविणार आहे़ मात्र किती जागा आणि कोणत्या ठिकाणच्या जागा हे नंतरच कळेल, असे ...

ठळक मुद्देनेत्यांनीही जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि जनतेने नेत्यावर विश्वास ठेवला पाहिजे - नारायण राणे शेतकरी हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे़ त्यांना सुखी ठेवणे हे सरकारचे काम - नारायण राणे

पंढरपूर : स्वाभिमान पक्ष आगामी निवडणूक लढविणार आहे़ मात्र किती जागा आणि कोणत्या ठिकाणच्या जागा हे नंतरच कळेल, असे सांगून खा़ नारायण राणे यांनी उत्सुकता कायम ठेवली आहे.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त वाडीकुरोली येथे आयोजित पुरस्कार वितरण व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आ़ भारत भालके, संयोजक सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, नीलम राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत, राजूबापू पाटील, माजी आ़ शहाजीबापू पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगदीश बाबर, नगरसेवक चेतन नरोटे, संतोष पाटील, प्रतिभादेवी पतसंस्थेचे उपाध्यक्ष शहाजी साळुंखे, विठ्ठलचे संचालक महादेव देठे, कॉँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नागेश फाटे, नारायण मोरे, सुरेश देठे आदी उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले, मी मुख्यमंत्री झालो, विविध खात्यांचे मंत्री होतो. लोकांची अहोरात्र कामे केली़ कोकणातून सहा वेळा निवडून आलो़ सातव्या वेळी पुन्हा निवडून येणार असे वाटत होते, मात्र पराभूत झालो. सुशीलकुमार शिंदे हे देखील राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनीही विविध खात्यांचे मंत्रीपद भूषविले़ इतकेच नाही तर केंद्रातही ऊर्जामंत्री, गृहमंत्री अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले़ जनतेची कामे करूनही आम्हाला पराभूत का व्हावं लागतं हो ? असा सवाल करीत नेत्यांनीही जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि जनतेने नेत्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असे खा. नारायण राणे यांनी सांगितले.

शेतकरी हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे़ त्यांना सुखी ठेवणे हे सरकारचे काम आहे, मग ते कोणत्याही पक्षाचे असो़ परंतु नेत्यांच्या आश्वासनाने आणि घोषणेने त्यांचे पोट भरत नाही तर कृती केली पाहिजे़ शेतकरी विकासाचा घटक आहे, मात्र त्यांना सध्या दुष्काळात हालअपेष्टा करायला लावणे चुकीचे आहे़ सरकारने चारा छावणी सुरू करण्यासाठी कोणत्याही नियम व अटीचे बंधन घालू नये़ जनावरांना चारा द्यायचाच असेल तर उदार मनाने द्यावे, असा सल्ला नारायण राणे यांनी सरकारला दिला. 

टॅग्स :SolapurसोलापूरNarayan Raneनारायण राणे Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक