शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

...तर सुशीलकुमार शिंदेंची माघार; पालकमंत्री देशमुखांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 13:22 IST

आम्ही विकासकामाची पावती घेऊन लोकांपर्यंत जात आहोत तर काँग्रेसचे नेते पार्ट्या देऊन लोकांना खूश करीत आहेत.

ठळक मुद्दे सध्या राजकीय परिस्थिती बदलेली आहे. आम्ही विकासकामाची पावती घेऊन लोकांपर्यंत जात आहोत - विजयकुमार देशमुखकाँग्रेसचे नेते पार्ट्या देऊन लोकांना खूश करीत आहेत, पण आता जनता हुशार आहे - विजयकुमार देशमुख

सोलापूर : भाजपातर्फे डॉ. जयसिद्धेश्वर महाराज आणि बहुजन वंचित आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांची सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी फायनल झाली तर काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे माघार घेतील, अशी शंका पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 

लोकसभा निवडणुकीच्या हालचालींबाबत निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की, सध्या राजकीय परिस्थिती बदलेली आहे. आम्ही विकासकामाची पावती घेऊन लोकांपर्यंत जात आहोत तर काँग्रेसचे नेते पार्ट्या देऊन लोकांना खूश करीत आहेत, पण आता जनता हुशार आहे. 

तुम्ही काय काम केले ते आधी सांगा, असा जाब विचारला जात आहे. काँग्रेसकडे ६० वर्षे सत्ता होती. या काळात काँग्रेसला शहराचा विकास करता आलेला नाही. तीच ती कामे केल्याचे लोकांना सांगितले जात आहे. तुम्ही खरेच काम केले असते तर ही पाळी आली नसती. 

सध्या देशभरात राजकीय हवा बदललेली आहे. भाजपामध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. इतर पक्षात निवडून येण्याची खात्री नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील चित्र असेच आहे. भाजपातर्फे जर डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांना उमेदवारी दिली गेली आणि बहुजन वंचित आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी जर सोलापुरातून निवडणूक लढविली तर मात्र काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीला उभे राहील की नाही, ही शंकाच असल्याचे मत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव न घेता व्यक्त केली. 

ही वेळ का आली- आमदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमाबाबत केलेल्या आरोपाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले. तुम्ही जर कामे वेळेवर केली असती तर ही वेळ आली असती का, असा सवाल त्यांनी केला. मोहिते-पाटील यांच्यामुळे भाजपाची ताकद वाढली आहे. आता भविष्यात याचे परिणाम दिसून येतील. 

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक