शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

मृत कोरोना योध्या संदर्भात पाठविलेल्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 13:21 IST

जनहित याचिकेमध्ये रूपांतर; सोलापूरचे वकील ॲड. मंजुनाथ कक्कळमेली यांनी पाठवले होते पत्र

सोलापूर: कोरोना लढ्यात प्राण गमावलेल्या लढ्यात आपल्या जीवाची आहुती देणाऱ्या डॉक्टर, पोलिस, परिचारिका, कर्मचारी, सफाई कामगार यांना शहीद म्हणून जाहीर करा, असे ॲड. मंजुनाथ कक्कळमेली यांनी पाठवलेल्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांनी दखल घेतली आहे. पत्राचे जनहित याचिकामध्ये रूपांतर झाले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे आजार देशात फोफावत असताना,  देशात रुग्ण वाढत आहेत व कोरोनासारखा अदृश्य जीव घेणी रोगा सोबतच्या लढ्यात आपले डॉक्टर, हॉस्पिटल कर्मचारी व पोलिस अधिकारी व कर्मचारी हे स्वतःचा जीव धोक्यात घालून, जीवाची पर्वा न करता कोरोनाशी दोन हात करीत आहेत. अशातच कोरोनाशी दोन हात करताना आपले डॉक्टर, हॉस्पिटल कर्मचारी व पोलिस यांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे, परंतु दुदैवी बाब अशी की ह्या आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या कोरोना वीरांचे बातमी ही कोरोनामुळे 'दगावले' अशी होत आहे. परंतु ज्या अर्थी आपल्या प्राणाची व कुटुंबाची पर्वा ही न करता हे कोरोना वीर आपल्या जीवाची आहुती देत आहेत त्या अर्थी त्यांना 'दगावले' असे न म्हणता 'शहिद' झाले असे संबोधावे व त्या कोरोना वीरांना 'शहीद ' चा दर्जा देण्यात यावा, त्यांचे अंतिम संस्कार शासकीय इतमामात व्हावे व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना वीरांचे पूर्ण वेळ पगार द्यावे व युध्दात शहीद होणाऱ्या जवानांना जी सवलत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिली जाते तशी सवलत ह्या कोरोना वीरांना द्यावी असे निर्देशन केंद्र शासनास दयावे. अशी विनंती वजा पत्र मंजुनाथ कक्कळमेली यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याकडे केली होती.

या पत्रात चीन सरकारने आपल्या एका डॉक्टरला 'मरणोत्तर हुतात्मा' म्हणून जाहीर केल्याचे व २१.०४.२०२० रोजी ओडिशा सरकारने कोरोनाही लढणाऱ्या योद्धा बाबत जाहीर केल्या असल्याचे ही नमूद केले आहे.

तसेच भारतात 'शहीद' कोणाला संबोधावे या संदर्भात कुठलाच कायदा आजवर अस्तित्वात नाही, त्यावर सुद्धा उपाययोजना करणे संबधी केंद्र सरकारला निर्देशन द्यावे असे सुद्धा या पत्रात नमूद केले आहे.

जनहित याचिकेवर लवकरच सुनावणीहोईल: ॲड. मंजुनाथ कक्कळमेलीकोरोनाच्या लढ्यात डॉक्टर, हॉस्पिटलचे कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. बऱयाच जणांना यामध्ये आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. हा प्रकार आद्यप सुरूच आहे त्यामुळे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना मे २०२० मध्ये पत्र पाठवले होते. पत्राची दखल घेत न्यायमूर्तींनी याची नोंद करून घेतली आहे. विनंती पत्र इयत्ता एक जनहित याचिका झाले असून यावर पुढील सुनावणी होईल अशी माहिती ॲड.मंजुनाथ कक्कळमेली यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCourtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय