शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
5
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
6
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
7
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
8
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
9
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
10
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
11
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
12
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
13
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
14
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
15
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
16
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
17
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
18
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
19
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महापरिनिर्वाण दिन; मुंबईला जाण्यासाठी सोलापूरहुन दोन विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 10:44 IST

मध्य रेल्वे प्रशासनाची तयारी; विशेष गाडीला ११ डबे जोडले

ठळक मुद्देभीमसैनिकांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून दोन विशेष गाड्या धावणार सोलापूरहून निघणाºया विशेष गाडीला ११ डबे जोडण्यात येणार कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी आरपीएफ पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार

सोलापूर : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाणाºया भीमसैनिकांसाठी मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून दोन विशेष गाड्या धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही होणारी वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून मुंबईला जाण्यासाठी गुरूवार, दिनांक ५ डिसेंबर २०१९ रोजी रात्री ९़३० वाजता सोलापूर स्थानकातून गाडी सुटणार आहे़ ही गाडी सकाळी ८़२० वाजता मुंबईत पोहोचणार आहे़ सोलापूरहून मुंबईला जाणारी गाडी सोलापूर-कुर्डूवाडी-दौंड-पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-दादर-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी धावणार आहे.

दरम्यान, कलबुर्गीहून मुंबईला जाण्यासाठी गुरूवार, दिनांक ५ डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ६़२५ वाजता कलबुर्गी स्थानकातून विशेष गाडी सोडण्यात येणार आहे़ सकाळी ८़२० वाजता मुंबईला पोहोचणार आहे़ याशिवाय मुंबईहून सोलापूरकडे येण्यासाठी ७ डिसेंबर २०१९ रोजी रात्री १२़२५ वाजता मुंबईहून सुटेल व सकाळी १०़१० वाजता सोलापुरात पोहोचणार आहे़ कलबुर्गीला जाण्यासाठी ७ डिसेंबर रोजी १२़२५ वाजता गाडी सुटणार असून, दुसºया दिवशी दुपारी १़४० वाजता कलबुर्गीला पोहोचेल.

विशेष गाडीला ११ डबे जोडले़...- सोलापूरहून निघणाºया विशेष गाडीला ११ डबे जोडण्यात येणार आहेत़ याशिवाय कलबुर्गीहून निघणाºया विशेष गाडीला ७ डबे जोडण्यात येणार आहेत़ तरी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे़ प्रवाशांनी रेल्वे गाडीच्या दाराजवळ, टपावरती बसून रेल्वे प्रवास करू नये, जेणेकरून प्राणहानी होणार नाही याची काळजी घ्यावी़ दरम्यान, रेल्वेस्थानक व परिसर स्वच्छ ठेवण्यास रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे़ 

आरपीएफ पोलिसांचा असणार वॉच- कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी आरपीएफ पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे़ याशिवाय प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठीही आरपीएफ पोलीस प्रयत्न करणार आहेत़ प्रवाशांनी रेल्वे गाडीच्या दाराजवळ, टपावरती बसून रेल्वे प्रवास करू नये, असे आवाहन आरपीएफचे सुरक्षा आयुक्त मिथुन सोनी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वेDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीMumbaiमुंबई