शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापरिनिर्वाण दिन; मुंबईला जाण्यासाठी सोलापूरहुन दोन विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 10:44 IST

मध्य रेल्वे प्रशासनाची तयारी; विशेष गाडीला ११ डबे जोडले

ठळक मुद्देभीमसैनिकांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून दोन विशेष गाड्या धावणार सोलापूरहून निघणाºया विशेष गाडीला ११ डबे जोडण्यात येणार कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी आरपीएफ पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार

सोलापूर : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाणाºया भीमसैनिकांसाठी मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून दोन विशेष गाड्या धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही होणारी वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून मुंबईला जाण्यासाठी गुरूवार, दिनांक ५ डिसेंबर २०१९ रोजी रात्री ९़३० वाजता सोलापूर स्थानकातून गाडी सुटणार आहे़ ही गाडी सकाळी ८़२० वाजता मुंबईत पोहोचणार आहे़ सोलापूरहून मुंबईला जाणारी गाडी सोलापूर-कुर्डूवाडी-दौंड-पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-दादर-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी धावणार आहे.

दरम्यान, कलबुर्गीहून मुंबईला जाण्यासाठी गुरूवार, दिनांक ५ डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ६़२५ वाजता कलबुर्गी स्थानकातून विशेष गाडी सोडण्यात येणार आहे़ सकाळी ८़२० वाजता मुंबईला पोहोचणार आहे़ याशिवाय मुंबईहून सोलापूरकडे येण्यासाठी ७ डिसेंबर २०१९ रोजी रात्री १२़२५ वाजता मुंबईहून सुटेल व सकाळी १०़१० वाजता सोलापुरात पोहोचणार आहे़ कलबुर्गीला जाण्यासाठी ७ डिसेंबर रोजी १२़२५ वाजता गाडी सुटणार असून, दुसºया दिवशी दुपारी १़४० वाजता कलबुर्गीला पोहोचेल.

विशेष गाडीला ११ डबे जोडले़...- सोलापूरहून निघणाºया विशेष गाडीला ११ डबे जोडण्यात येणार आहेत़ याशिवाय कलबुर्गीहून निघणाºया विशेष गाडीला ७ डबे जोडण्यात येणार आहेत़ तरी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे़ प्रवाशांनी रेल्वे गाडीच्या दाराजवळ, टपावरती बसून रेल्वे प्रवास करू नये, जेणेकरून प्राणहानी होणार नाही याची काळजी घ्यावी़ दरम्यान, रेल्वेस्थानक व परिसर स्वच्छ ठेवण्यास रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे़ 

आरपीएफ पोलिसांचा असणार वॉच- कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी आरपीएफ पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे़ याशिवाय प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठीही आरपीएफ पोलीस प्रयत्न करणार आहेत़ प्रवाशांनी रेल्वे गाडीच्या दाराजवळ, टपावरती बसून रेल्वे प्रवास करू नये, असे आवाहन आरपीएफचे सुरक्षा आयुक्त मिथुन सोनी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वेDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीMumbaiमुंबई