शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महापरिनिर्वाण दिन; मुंबईला जाण्यासाठी सोलापूरहुन दोन विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 10:44 IST

मध्य रेल्वे प्रशासनाची तयारी; विशेष गाडीला ११ डबे जोडले

ठळक मुद्देभीमसैनिकांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून दोन विशेष गाड्या धावणार सोलापूरहून निघणाºया विशेष गाडीला ११ डबे जोडण्यात येणार कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी आरपीएफ पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार

सोलापूर : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाणाºया भीमसैनिकांसाठी मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून दोन विशेष गाड्या धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही होणारी वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून मुंबईला जाण्यासाठी गुरूवार, दिनांक ५ डिसेंबर २०१९ रोजी रात्री ९़३० वाजता सोलापूर स्थानकातून गाडी सुटणार आहे़ ही गाडी सकाळी ८़२० वाजता मुंबईत पोहोचणार आहे़ सोलापूरहून मुंबईला जाणारी गाडी सोलापूर-कुर्डूवाडी-दौंड-पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-दादर-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी धावणार आहे.

दरम्यान, कलबुर्गीहून मुंबईला जाण्यासाठी गुरूवार, दिनांक ५ डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ६़२५ वाजता कलबुर्गी स्थानकातून विशेष गाडी सोडण्यात येणार आहे़ सकाळी ८़२० वाजता मुंबईला पोहोचणार आहे़ याशिवाय मुंबईहून सोलापूरकडे येण्यासाठी ७ डिसेंबर २०१९ रोजी रात्री १२़२५ वाजता मुंबईहून सुटेल व सकाळी १०़१० वाजता सोलापुरात पोहोचणार आहे़ कलबुर्गीला जाण्यासाठी ७ डिसेंबर रोजी १२़२५ वाजता गाडी सुटणार असून, दुसºया दिवशी दुपारी १़४० वाजता कलबुर्गीला पोहोचेल.

विशेष गाडीला ११ डबे जोडले़...- सोलापूरहून निघणाºया विशेष गाडीला ११ डबे जोडण्यात येणार आहेत़ याशिवाय कलबुर्गीहून निघणाºया विशेष गाडीला ७ डबे जोडण्यात येणार आहेत़ तरी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे़ प्रवाशांनी रेल्वे गाडीच्या दाराजवळ, टपावरती बसून रेल्वे प्रवास करू नये, जेणेकरून प्राणहानी होणार नाही याची काळजी घ्यावी़ दरम्यान, रेल्वेस्थानक व परिसर स्वच्छ ठेवण्यास रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे़ 

आरपीएफ पोलिसांचा असणार वॉच- कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी आरपीएफ पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे़ याशिवाय प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठीही आरपीएफ पोलीस प्रयत्न करणार आहेत़ प्रवाशांनी रेल्वे गाडीच्या दाराजवळ, टपावरती बसून रेल्वे प्रवास करू नये, असे आवाहन आरपीएफचे सुरक्षा आयुक्त मिथुन सोनी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वेDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीMumbaiमुंबई