शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ऊस गाळपात कोल्हापूरला अहमदनगरने मागे टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:05 IST

सोलापूर जिल्हा मात्र पहिल्या क्रमांकावरच

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा ऊस गाळपात राज्यात प्रथम क्रमांकावर ऊस गाळपात कोल्हापूर जिल्ह्याला अहमदनगर जिल्ह्याने मागे टाकलेसोलापूरचे गाळप अवघे ३६ लाख मे. टन इतकेच

अरुण बारसकरसोलापूर: यंदा ऊस गाळपात कोल्हापूर जिल्ह्याला अहमदनगर जिल्ह्याने मागे टाकले असून, आजही तीन साखर कारखाने सुरू असताना एक कोटी ३६ लाख ९० हजार ४८ मे. टन गाळप झाले आहे. सोलापूर जिल्हा मात्र पहिल्या क्रमांकावरच आहे.राज्यात यावर्षी साखर हंगाम सुरू केलेल्या १८७ कारखान्यांपैकी सोमवारपर्यंत १८१ कारखान्यांचा पट्टा पडला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील तीन, पुणे जिल्ह्यातील दोन व औरंगाबाद विभागातील एका कारखाना सुरू असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

यावर्षी सोलापूर जिल्हा ऊस गाळपात राज्यात प्रथम क्रमांकावर असून, मागील महिन्यापर्यंत दुसºया क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा होता. कोल्हापूर जिल्ह्यातील सुरू झालेले सर्वच २२ कारखाने १० एप्रिलपर्यंत बंद झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे एकूण गाळप एक कोटी ३३ लाख ६३ हजार ८९६ मे. टन झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातीलही २२ कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. त्यापैकी १९ कारखाने बंद झाले असून, उर्वरित तीन कारखाने सुरू आहेत. 

या कारखान्यांनी सोमवारपर्यंत एक कोटी ३६ लाख ९० हजार ४८ मे. टन गाळप केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढल्याचा हा परिणाम असून, गाळपात कोल्हापूर जिल्ह्याला मागे टाकले आहे. सोलापूर जिल्हा मात्र राज्यात प्रथम क्रमांकावरच असून, सोलापूर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांनी एक कोटी ६९ लाख ३५ हजार ४९६ मे. टन ऊस गाळप केले असून, एक कोटी ७९ लाख १७ हजार ७३३ क्विंटल साखर तयार झाली आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटल्याने सोलापूरचे गाळप अवघे ३६ लाख मे. टन इतकेच झाले होते.

चार कारखान्यांचा उतारा कमीच...- सोलापूर जिल्ह्यातील गाळप घेतलेल्या ३० कारखान्यांपैकी २६ कारखान्यांचा साखर उतारा १० टक्क्यांपेक्षा अधिक असून, सिद्धेश्वर, सिद्धनाथ, भैरवनाथ विहाळ व भैरवनाथ लवंगी या कारखान्यांचा अंतिम साखर उतारा १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. या उताºयाचा परिणाम पुढील वर्षी एफ.आर.पी.प्रमाणे शेतकºयांना दर देण्यावर होणार आहे. गाळपात आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्याचा साखर उतारा कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे ऊसाचा दरावर परिणाम होणार आहे.

यंदा दुपटीहून अधिक गाळप- राज्याचे गाळप ९ कोटी ५१ लाख ५३ हजार इतके झाले असून, १० कोटी ७० लाख ८० हजार क्विंटल साखर तयार झाली आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी दुपटीहून अधिक गाळप झाले आहे. साखरही त्याच पटीत तयार झाली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने