शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

ऊस गाळपात कोल्हापूरला अहमदनगरने मागे टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:05 IST

सोलापूर जिल्हा मात्र पहिल्या क्रमांकावरच

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा ऊस गाळपात राज्यात प्रथम क्रमांकावर ऊस गाळपात कोल्हापूर जिल्ह्याला अहमदनगर जिल्ह्याने मागे टाकलेसोलापूरचे गाळप अवघे ३६ लाख मे. टन इतकेच

अरुण बारसकरसोलापूर: यंदा ऊस गाळपात कोल्हापूर जिल्ह्याला अहमदनगर जिल्ह्याने मागे टाकले असून, आजही तीन साखर कारखाने सुरू असताना एक कोटी ३६ लाख ९० हजार ४८ मे. टन गाळप झाले आहे. सोलापूर जिल्हा मात्र पहिल्या क्रमांकावरच आहे.राज्यात यावर्षी साखर हंगाम सुरू केलेल्या १८७ कारखान्यांपैकी सोमवारपर्यंत १८१ कारखान्यांचा पट्टा पडला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील तीन, पुणे जिल्ह्यातील दोन व औरंगाबाद विभागातील एका कारखाना सुरू असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

यावर्षी सोलापूर जिल्हा ऊस गाळपात राज्यात प्रथम क्रमांकावर असून, मागील महिन्यापर्यंत दुसºया क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा होता. कोल्हापूर जिल्ह्यातील सुरू झालेले सर्वच २२ कारखाने १० एप्रिलपर्यंत बंद झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे एकूण गाळप एक कोटी ३३ लाख ६३ हजार ८९६ मे. टन झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातीलही २२ कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. त्यापैकी १९ कारखाने बंद झाले असून, उर्वरित तीन कारखाने सुरू आहेत. 

या कारखान्यांनी सोमवारपर्यंत एक कोटी ३६ लाख ९० हजार ४८ मे. टन गाळप केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढल्याचा हा परिणाम असून, गाळपात कोल्हापूर जिल्ह्याला मागे टाकले आहे. सोलापूर जिल्हा मात्र राज्यात प्रथम क्रमांकावरच असून, सोलापूर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांनी एक कोटी ६९ लाख ३५ हजार ४९६ मे. टन ऊस गाळप केले असून, एक कोटी ७९ लाख १७ हजार ७३३ क्विंटल साखर तयार झाली आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटल्याने सोलापूरचे गाळप अवघे ३६ लाख मे. टन इतकेच झाले होते.

चार कारखान्यांचा उतारा कमीच...- सोलापूर जिल्ह्यातील गाळप घेतलेल्या ३० कारखान्यांपैकी २६ कारखान्यांचा साखर उतारा १० टक्क्यांपेक्षा अधिक असून, सिद्धेश्वर, सिद्धनाथ, भैरवनाथ विहाळ व भैरवनाथ लवंगी या कारखान्यांचा अंतिम साखर उतारा १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. या उताºयाचा परिणाम पुढील वर्षी एफ.आर.पी.प्रमाणे शेतकºयांना दर देण्यावर होणार आहे. गाळपात आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्याचा साखर उतारा कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे ऊसाचा दरावर परिणाम होणार आहे.

यंदा दुपटीहून अधिक गाळप- राज्याचे गाळप ९ कोटी ५१ लाख ५३ हजार इतके झाले असून, १० कोटी ७० लाख ८० हजार क्विंटल साखर तयार झाली आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी दुपटीहून अधिक गाळप झाले आहे. साखरही त्याच पटीत तयार झाली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने