शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

दिल्लीतील पुतळा विटंबना प्रकरण; एनएसयूआयच्या फलकावर शाई फेकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 11:40 IST

विद्यार्थी परिषदेच्या विरोधात दिली तक्रार; सोलापुरातील काँग्रेस भवनासमोर घोषणाबाजी अन् निदर्शने

ठळक मुद्देदिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीसाठी १२ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानिवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी जिल्ह्यात असणाºया विद्यार्थी संघटनात आताच वाद सुरू

सोलापूर : दिल्ली येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे पडसाद सोलापूर शहरात पडले. जिल्हा परिषदेसमोरील काँग्रेस भवन येथे असणाºया एनएसयुआयच्या (नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया) फलकावर शाई फेकण्यात आली. या विरोधात एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्यावेळी भगतसिंग जिंदाबाद अशा घोषणाही देण्यात आल्या होत्या. हा पुतळा दिल्ली विद्यापीठाच्या परवानगीशिवाय लावण्यात आल्याचा अरोप एनएसयुआयने केला होता. बुधवारी रात्री एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील हिंदुत्ववादी संघटना सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हा परिषदेसमोरील काँग्रेस भवन येथे आले. कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन निदर्शने केली. हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद, कृषी गोसेवा संघ यांच्या कार्यकर्त्यांनी एनएसयुआयच्या फलकावर काळी शाई फेकली. यावेळी एनएसयुआय मुर्दाबाद, भारत मात की जय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, अशा घोषणाही देण्यात आल्या. गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजता गणेश डोंगरे यांना एनएसयुआयच्या  फलकावर शाई फेकल्याचे कळले. तिथे नगरसेवक विनोद भोसले, युवक कॉँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष तिरुपती परकीपंडला हे देखील आले. त्यांनी झालेल्या प्रकाराविरोधात एनएसयुआयकडून समर्थ बंडे, सुधीर बहिरवडे, यतिराज होनमाने, किरण जाधव, संकेत अटकळे, चिदंबर कारकल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

राजकारण तापले !- दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीसाठी १२ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर तेथील विद्यार्थी राजकारण चांगलेच तापले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी जिल्ह्यात असणाºया विद्यार्थी संघटनात आताच वाद सुरू झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर