शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वडार समाजाचा सोमवारी सोलापुरात राज्यस्तरीय महामेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 13:08 IST

सोलापूर : वडार समाजाचा कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये समावेश करुन एक देश-एक प्रवर्ग ...

ठळक मुद्देया मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यभरातून दीड लाख वडार बांधव उपस्थित राहणारआपले प्रश्न शासनाकर्त्याच्या समोर मांडून सोडवणूक करण्यासाठी हा महामेळावा सोमवार १७ डिसेंबर रोजी सोलापूरच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये वडार समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा

सोलापूर : वडार समाजाचा कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये समावेश करुन एक देश-एक प्रवर्ग हा न्याय देत एस. सी. - एस. टी. प्रवर्गाचेच आरक्षण द्यावे, समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ द्यावे या मुख्य मागण्यांसह समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने सोमवार १७ डिसेंबर रोजी सोलापूरच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये वडार समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा आयोजित केला असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

वडार समाजाच्या या महामेळाव्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सहकारमंत्री सुभाष देशमुख व सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख असे राज्याचे अर्धा डझन मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले. मंगळवारी हॉटेल ऐश्वर्या येथे  आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की, पार्क स्टेडियममध्ये होणाºया या मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यभरातून दीड लाख वडार बांधव उपस्थित राहणार आहेत. आपले प्रश्न शासनाकर्त्याच्या समोर मांडून सोडवणूक करण्यासाठी हा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. अत्यंत कष्टाळू असलेल्या वडार समाजाची अवस्था अत्यंत बिकट आहे. आजही दगड फोडण्याचे काम समाजबांधवांना करावे लागते. खडी व्यवसायात उतरलेल्या समाजबांधवांना शासनाच्या जाचक अटींमुळे उद्योग सोडावा लागतो आहे.

स्वातंत्र्यांची ७० वर्षे झाली तरी ७० ते ८० लाख लोकसंख्या असलेल्या राज्यातील वडार समाजाचा वनवास संपलेला नाही. किंबहुना त्यांच्यापर्यंत स्वातंत्र्यही पूर्णपणे पोहोचलेले नाही. म्हणून आता हा वडार समाज थोडाफार जागा होत असून ह्यमी वडार महाराष्ट्राच्या रुपाने संघटित होऊन शासन दरबारी प्रश्न मांडतो आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरात समाजाचा महामेळावा आम्ही घेत आहोत. समाजाचे प्रश्न शासनाच्या पुढ्यात मांडण्यासाठीच हा महामेळावा असल्याचेही त्यांनी सांगितले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवले