करकंबमध्ये वृक्षारोपणाने माझी वसुंधरा अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:27 IST2021-09-17T04:27:49+5:302021-09-17T04:27:49+5:30

पृथ्वी, जल, आकाश, वायू व अग्नी या पंचतत्त्वावर आधारीत असणाऱ्या ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्याचा संकल्प बुधवारी झालेल्या सभेत करण्यात ...

Start my Vasundhara expedition by planting trees in Karkamba | करकंबमध्ये वृक्षारोपणाने माझी वसुंधरा अभियानास प्रारंभ

करकंबमध्ये वृक्षारोपणाने माझी वसुंधरा अभियानास प्रारंभ

पृथ्वी, जल, आकाश, वायू व अग्नी या पंचतत्त्वावर आधारीत असणाऱ्या ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्याचा संकल्प बुधवारी झालेल्या सभेत करण्यात आला. या अभियानाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली.

यावेळी उपसरपंच आदिनाथ देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नरसाप्पा देशमुख, सरपंच प्रतिनिधी ॲड. शरदचंद्र पांढरे, जिल्हा माहिती व्यवस्थापक व संवाद तज्ज्ञ सचिन जाधव, विस्तार अधिकारी उत्तमराव साखरे, ल. पा. चे स्थापत्य अभियंता बंडू कारंडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे जाधव, विस्तार अधिकारी मोहन मस्के, प्रा. सतीश देशमुख, सचिन शिंदे, अशोक जाधव, नागेश वंजारी, मुस्तफा बागवान, सुनील मोहिते, महेंद्र शिंदे, दत्तात्रय खंदारे, संजय धोत्रे, ग्रामविकास अधिकारी डाॅ. सतीश चव्हाण, विजय मस्के, राजू शेटे, संजय खडके, फिरोजभाई बागवान उपस्थित होते.

सचिन जाधव यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ग्रामविकास अधिकारी डाॅ. सतीश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

------

‘माझी वसुंधरा’ अभियानातून ‘माझं गाव, माझं कुटुंब, माझं आरोग्य’ या दृष्टिकोनातून प्रत्येकाने पुढाकार घेऊन आपल्या स्वतःच्या व गावच्या आरोग्य नीट राहण्यासाठी या योजनेत सर्व प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.

- इशदिन शेळकंदे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी

---

Web Title: Start my Vasundhara expedition by planting trees in Karkamba