शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

धरतीने हिरवा शालू पांघरताच रंगीबेरंगी रानफुलांनी बहरली गावोगावची माळरानं...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 08:35 IST

वन महोत्सव विशेष; उजनी काठ परिसरात असलेल्या करमाळा तालुक्यातील चित्र...

अक्षय आखाडे

जेऊर : गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या मृगाच्या पावसाने जिह्यातील बहुतांश माळरानात आता आत्ता हिरवी चादर पसरली आहे. परिणामी कमी अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस झाल्याने माळरानावर असलेली विवध रान फुले फुलली असल्याने माळरानावर वेगळाच बहर आल्याचं चित्र दिसत आहे.

रंगीबेरंगी फुललेली ही फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रस्त्याच्या कडेचा मोकळ्या जागा, माळरानावर असलेल्या वगळी, नाले, पडीक शेते, शेताचे बांध इत्यादी ठिकाणी मुबलक प्रमाणात विविधरंगी फुले फुलली आहेत. असंख्य वर्षायू वनस्पतीं रुजण्यासाठी आणि आपलं वंश पुढे टिकून रहावा यासाठी च ही सगळी धडपड. फुलोऱ्यात आलेल्या रानफुलांचा मध मिळवण्यासाठी मधमाश्याची सुद्धा धावपळ सुरू आहे. असंख्य किडे फुलपाखरे मुंग्या यांचा या गवताच्या आधारावर आपलाही वंश टिकवण्याचा अट्टाहास करताना दिसताहेत. दवबिंदूची दुलयी पांघरलेली हिरव्या कुरूनावर शिंपल्यासारखी दिसणारी ही रंगीबेरंगी रानफुले मुक्त चैतन्य पेरण्याचे काम करताना दिसत आहेत.

रानफुलांच्या आढळणाऱ्या वनस्पती पुढीलप्रमाणे

केनपट, दुरंगी बाभळी,  टणटणी अथवा घाणेरी, ईचका, तरवड, सापकांदा, हसपळ, उरुळी,  कुर्मुडी, गुलाबी उन्हाळी, पांढर फळी, सराता, पुनर्नवा, कुर्डु, धोतरा,  कुळई, माकड शिंगी, पाथरी, भुई रिंगणी, गोधडी, काळमाशी रानभेडी, काचली, लाजाळू , बरबडा,  कललावी, छोटा कळपा, कोरांती, कतर्मेंदा, चांदवेल इत्यादी प्रकारच्या रानफुलांच्या वनस्पती आढळतात.

रानफुलाचे संवर्धन होणे गरजेचे

या वर्षी विविधरंगी रानफुले दिसत असली तरी दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून हे सगळंच कमी होताना दिसतंय. माळावरच्या मातीची धूप आणि वीटभट्टीसाठी लागणारी माती काढल्यामुळे  माळावरच्या मातीचा वरचा थरच गायब होतोय. आणि त्याबरोबरच त्यात सुप्तावस्थेत असलेल्या बिया ही नष्ट होऊन जाताहेत. निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या या रानफुलाचे संवर्धन करायलाच हवं.प्रतिक्रिया : पावसाळा आणि रानफुले यांचा अतूट संबंध आहे. आपल्याकडेही मृगाच्या पावसाबरोबर अनेक रानफुले माळावर, शेतात, उगवतात पावसाळा संपला की यांची पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघावी लागते.पण अलीकडे अनेक कारणांमुळे रानफुले आता दुर्मिळ होऊ लागल्या आहेत.त्याच संवर्धन होणे गरजेचे आहे.- विकास काळे  केतूररानभाज्या, रानफुलाचे अभ्यासक

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीUjine Damउजनी धरण