शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

सोलापूरकर घेताहेत हात धुऊन; अधिकाºयांच्या तोंडचं गेलं पाणी पळून...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 15:34 IST

सोलापूर शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा; अधिकाºयांचा अजब दावा.. ‘हे सारं लॉकडाऊनमुळेच’

ठळक मुद्देपंपगृहाची वीज दोन तास गेली तरी पुढील सहा तासांचे काम विस्कळीत होतेउन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढतेच; ३० मार्चपासून किमान ३५ वेळा वीज गेल्याच्या नोंदीत्रणेवर थोडा ताण आला आहे; सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे

सोलापूर : गेल्या एक महिन्यापासून शहरात पाच दिवसाआड, विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. उन्हाची तीव्रता आणि लॉकडाऊनच्या काळात सतत हात धुणे, कपडे धुणे या कारणांमुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे, असा अजब दावा करत पंपहाऊसचा वीजपुरवठा वारंवार खंडित होतोय. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे कारणही मनपा पुरवठा विभागातील अधिकारी देत आहेत.

मार्चपूर्वी शहरात तीन दिवसाआड व्यवस्थित पाणीपुरवठा सुरू होता. १५ मार्चनंतर पाणीपुरवठा विस्कळीत व्हायला सुरुवात झाली. औज बंधारा कोरडा पडला. उजनीतून बंधाºयात पाणी पोहोचायला उशीर झाला. या कालावधीत जुळे सोलापूरच्या टाकीतून पिवळसर पाण्याचा  पुरवठा झाला. एप्रिल महिन्यात मजरेवाडी, हत्तुरे वस्ती, शंकर  नगर, रेवणसिध्देश्वर नगर, संत रोहिदास नगर या भागात मध्यरात्री पाणीपुरवठा करण्यात आल्याची तक्रार नगरसेवक सुभाष शेजवाल यांनी केली होती.

एक मेपासून जुळे सोलापुरातील ज्ञानेश्वर नगर, सहस्रार्जुन नगर, भीमा नगर, पूनम नगर या भागात पाच दिवसाआड आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत़ यानंतर होटगी रोडवरील मोहितेनगर, बसवेश्वरनगर परिसरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. उन्हाळ्यात शहरात जास्त पाणी लागते. अनेक सोसायट्यांमध्ये बोअरवेल असतात. उन्हाळ्यात बोअरवेलचे पाणी कमी होते. त्यात मनपाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे लोक हैराण झाले आहेत. दीड महिन्यात ३५ वेळा पंपहाऊसची वीज गेली़मनपाचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी म्हणाले, उजनी, टाकळी, पाकणी या तीन पंपगृहावरील वीजपुरवठा वारंवार खंडित होतोय.

३० मार्चपासून किमान ३५ वेळा वीज गेल्याच्या नोंदी आहेत. पंपगृहाची वीज दोन तास गेली तरी पुढील सहा तासांचे काम विस्कळीत होते. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढतेच. पण आता लॉकडाऊनमुळे बाहेरगावचे लोक शहरात आले आहेत. पाण्याची मागणी  वाढली आहे. यंत्रणेवर थोडा ताण आला आहे. सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. वीज गेली तर आणखी एक दिवस उशिरा पाणीपुरवठा होतो.  चावीवाल्यांची बैठक घ्या...- अधिकारी आणि चावीवाले वेगळी माहिती देत असल्याचे दिसते. वरिष्ठ अधिकाºयांनी चावीवाल्यांची पुन्हा बैठक घ्यावी. ज्या भागातून तक्रारी येत आहेत तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी. लॉकडाऊनच्या काळात पाणीपुरवठा विभाग काम करतोय. त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे. परंतु, पाणी पुरवठ्याचे नियोजन बिघडले आहे. त्यात तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, असे नगरसेवक सुभाष शेजवाल म्हणाले.

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस