शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा बँकेकडे पैसे नसल्याने खरिपाचे कर्ज वाटप ४० कोटींनी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 13:39 IST

दुष्काळ व कर्जमाफीचा परिणाम; माफीच्या अपेक्षेने शेतकºयांनी रक्कमच भरली नाही

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला खरीप हंगामासाठी ३०३ कोटी ९२ लाख ९७ हजार रुपये पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्टसोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा अशी ओळख असली तरी  मागील काही वर्षांत खरीप पेरणीचे क्षेत्रही वाढलेसंपूर्ण कर्जमाफी होईल या अपेक्षेने आजही शेतकरी बँकांचे कर्ज भरण्यास तयार नाहीत

सोलापूर: संपूर्ण कर्जमाफी होईल या अपेक्षेने आजही शेतकरी बँकांचे कर्ज भरण्यास तयार नाहीत त्यातच पाऊस नसल्याचाही परिणाम झाला असून, खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप मागील वर्षीच्या तुलनेत ४० कोटीने कमी झाले आहे. जिल्हा बँकेकडे पैसे नसल्याचीही प्रमुख अडचण आहेच.

सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा अशी ओळख असली तरी  मागील काही वर्षांत खरीप पेरणीचे क्षेत्रही वाढले आहेच. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला खरीप हंगामासाठी ३०३ कोटी ९२ लाख ९७ हजार रुपये पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट  आहे. 

या हंगामात सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकाशिवाय उसाची लागवडही मोठ्या प्रमाणावर केली जाते व जिल्हा बँक ऊस लागवडीसाठी एकूण कर्जाच्या ६५ टक्के कर्ज उसासाठी देते. मागील दोन-तीन वर्षांत राज्यातील काही जिल्ह्यात सलग दुष्काळी परिस्थिती असल्याने संपूर्ण कर्जमाफीची मागणी होत होती. राज्य शासनाने दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले असून आजही संपूर्ण कर्जमाफी होईल या अपेक्षेने शेतकरी कर्ज भरण्यास तयार नाहीत. याशिवाय जुने कर्ज भरले तर नव्याने कर्ज बँका देतात; मात्र पाऊस नसल्याने शेतात पीकच नसल्याने बँका कर्ज देतीलच असे नाही. यामुळे शेतकरी कोणतेही कर्ज भरण्यास तयार नाहीत. 

मागील वर्षी खरीप हंगामासाठी आतापर्यंत १६८ कोटी ९६ लाख ७९ हजार रुपये पीक कर्ज वाटप झाले होते. यावर्षी त्यात ४० कोटीने घट झाली आहे. 

यावर्षी आतापर्यंत १२८ कोटी ८५ लाख ९४ हजार रुपये पीक कर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यात पाऊस म्हणावा तसा किंवा खरीप पिकांसाठी पोषक तेवढा पडला नसल्याने शेतकरी पीककर्ज मागणीसाठी बँकांकडे येत नाहीत. जिल्हा बँकेकडे कर्ज देण्यासाठी पैसेच नसल्याने जे शेतकरी पूर्वीच्या कर्जाचा भरणा करतील व भरणा केलेलीच रक्कम त्या शेतकºयाला नव्याने कर्ज म्हणून दिली जात आहे. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा यावर्षी कर्ज वाटप कमी झाले असल्याचे सांगण्यात आले.

तर कर्ज वाटपाचा आकडा वाढेल..सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात उसाची लागवड केली जाते व जिल्हा बँकही ऊस लागवडीवर कर्ज देते. जुने कर्ज शेतकरी भरतात व नव्याने कर्जही बँक देते. यापुढील नक्षत्रात चांगला पाऊस पडला,उजनी धरण, तलाव भरले तर उसाच्या लागवडीला वेग येईल व कर्ज वाटपाचा आकडाही वाढेल असे सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्रgovernment schemeसरकारी योजनाagricultureशेती