शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

विद्याताईंच्या स्त्रीवादी चळवळीला सोलापूरकरांचीही होती साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:08 IST

सोलापूर शहरातील मान्यवरांची श्रद्धांजली : दिला आठवणींना उजाळा; महिलांच्या राजकारणातील सहभागावर केले होते मार्गदर्शन

ठळक मुद्देमहिलांच्या समान हक्कांसाठी सतत झटणाºया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलासमाजात महिलांवर होणाºया अत्याचार, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे कार्य त्यांनी मोठ्या प्रमाणात केले

सोलापूर : महिलांच्या समान हक्कांसाठी सतत झटणाºया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

सामाजिक कार्यकर्त्या आणि स्त्रीवादी लेखिका म्हणून त्यांची ओळख होती. समाजात महिलांवर होणाºया अत्याचार, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे कार्य त्यांनी मोठ्या प्रमाणात केले होते. त्यांच्या या चळवळीत सोलापूरकरांनीही साथ दिली होती. विद्याताई यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

विद्याताई या १९९७ मध्ये सोलापुरात आल्या होत्या . त्यावेळी त्यांनी हिराचंद नेमचंद वाचनालयात ३० टक्के बायकांचा राजकारणात सहभाग या विषयावर मार्गदर्शन केले. 

१९९८ मध्ये दिशा अभ्यास मंडळ या स्त्रिया आणि मुलांसाठी काम करणाºया संस्थेची स्थापना त्यांच्या हस्ते झाली. १९९९ मध्ये ‘जोडीदार जीवनाचा’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी त्या आल्या होत्या. 

दिशा अभ्यास मंडळाच्या दशकपूर्तीनिमित्त त्यांनी चाकोरी नावाच्या चित्रपटाद्वारे स्त्रियांनी आपल्या पायातल्या रितीरिवाजांचे साखळदंड  कसे काढून  टाकले पाहिजेत, हे सांगितले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हिराचंद नेमचंद आणि परिवर्तन अ‍ॅकॅडमी यांच्या दोन दिवसांच्या शिबिरासाठी त्या आल्या होत्या. इच्छामरण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. 

या विषयावरील त्यांचे पुस्तक खूप लोकांना भावले. त्यांनी महाराष्ट्रभर या विषयावर व्याख्याने दिली. १९९८ मध्ये सोलापुरात त्या इच्छामरण या विषयावर बोलण्यासाठी आल्या होत्या. 

विद्याताई यांनी कायम स्त्री-पुरुष समतेचा आग्रह धरला. मिळून साºया जणी या मासिकातून त्यांनी स्त्रियांचे प्रश्न मांडले. त्या अनेकदा सोलापुरात व्याख्यानासाठी आल्या होत्या. त्या फक्त अभ्यासू वक्त्या नव्हे तर क्रियाशील सामाजिक कार्यकर्त्या होत्या.   - डॉ. श्रीकांत येळेगावकर, कार्यवाह, हिराचंद नेमचंद वाचनालय

स्त्री चळवळीमध्ये स्त्रीला पुरुषाची साथ असायला हवी म्हणून त्यांनी या चळवळीत पुरुषांना सामील करुन घेतले. स्त्रियांना स्वतंत्र विचार व अस्तित्वाची जाणीव करुन दिली. त्यांच्यामुळेच आज लाखो स्त्रिया स्वतंत्रपणाने विचार करत आहेत, मनासारखं आयुष्य जगत आहेत. - अ‍ॅड. नीला मोरे, संस्थापक, दिशा अभ्यास मंडळ

स्त्रियांवर होणाºया अत्याचाराविरोधात जागृती करण्यासाठी विद्याताई यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात केडर उभे केले होते. पुरोगामी चळवळीतील त्या अग्रणी होत्या. वयाच्या ८३ व्या वर्षीही त्या व्याख्याने देत होत्या. देशात महिलांसाठी काम करणाºयांमध्ये त्यांचे नाव हे सदैव पुढे राहील.- दत्ता गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

ज्या काळात आम्ही सामाजिक कार्यात भाग घेत होतो, त्या काळात विविध विषयांवर प्रबोधन करण्याची गरज होती. हे काम विद्यातार्इंनी केले. राज्यातील स्त्रियांमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावरही खूप प्रभाव पडला होता.- निर्मलाताई ठोकळ, माजी आमदार

टॅग्स :SolapurसोलापूरVidya Balविद्या बाळDeathमृत्यू