शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सोलापूर : आगीत सापडलेल्या झाडांना पुन्हा फुटली पालवी, पर्यावरणप्रेमींची मेहनत

By शीतलकुमार कांबळे | Updated: May 10, 2024 15:51 IST

झाडांसोबत अक्षय तृतीया साजरी

सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज तलाव व स्मृती उद्यान शेजारी असलेल्या रेल वनविहार येथे झाडांना दोन महिन्यापूर्वी आग लागली होती. आगीमध्ये झाडांची पाने, फांद्या जळून गेल्या होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी झाडांची काळजी घेतली. पाणी व खत देण्यात आले. यामुळे पुढील दोन महिन्यापासून आगीत होरपळलेल्या झाडांना पालवी फुटली. 

झाडांना पुनर्जिवित करण्यासाठी सतत प्रयत्न करणारे पर्यावरण प्रेमीं योगेश शेषगिरी, रोहीत मैंदर्गीकर हे वनविभागातील झाडांना नियमित रोज पाणी देऊन उन्हाळ्यात सुद्धा झाडं हिरवीगार ठेवून उल्लेखनीय काम केलं. पालवी फुटलेल्या झाडांसोबत आणखी झाडे लावत अक्षय तृतीया सण साजरा झाला. शुक्रवार १० मे रोजी रेल्वे वन विहार येथे मंडल रेल प्रबंधक नीरजकुमार दोहरे यांच्या हस्ते झाडांची पूजा करुन अक्षय तृतीया सण झाडांसोबत साजरा करण्यात आला. तेथील रहिवासी मोतेकर यांच्याकडून पाणी घेऊन प्रत्येक झाडाला देण्यात आले. 

अक्षय तृतीया निमित्त आंबा, नारळ, सिताफळ, बांबू आणि कारंज अशी नवी रोपटी लावण्यात आली. त्याचबरोबर पक्षांसाठी रुक्मिणी कदम यांनी जवळपास १०० जल-कुंडांचे दान केले. झाडांवर पाण्याची सोय केली. शिवाजी कदम तसेच नूतन वरिष्ठ मंडल संरक्षा‌ अधिकारी रामचंद्रन आणि इतर वरिष्ठांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी जितेंद्र. वाघमारे, शिवाजी कदम, रामचंद्रन, बी. आर. भगत, पर्यावरणप्रेमी प्रवीण तळे, संत निरंकारी मंडळाचे सदस्य अनिता पवार, संरक्षा विभागाची संपुर्ण टिम उपस्थित होती.

टॅग्स :Solapurसोलापूर