शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

सोलापूर : आगीत सापडलेल्या झाडांना पुन्हा फुटली पालवी, पर्यावरणप्रेमींची मेहनत

By शीतलकुमार कांबळे | Updated: May 10, 2024 15:51 IST

झाडांसोबत अक्षय तृतीया साजरी

सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज तलाव व स्मृती उद्यान शेजारी असलेल्या रेल वनविहार येथे झाडांना दोन महिन्यापूर्वी आग लागली होती. आगीमध्ये झाडांची पाने, फांद्या जळून गेल्या होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी झाडांची काळजी घेतली. पाणी व खत देण्यात आले. यामुळे पुढील दोन महिन्यापासून आगीत होरपळलेल्या झाडांना पालवी फुटली. 

झाडांना पुनर्जिवित करण्यासाठी सतत प्रयत्न करणारे पर्यावरण प्रेमीं योगेश शेषगिरी, रोहीत मैंदर्गीकर हे वनविभागातील झाडांना नियमित रोज पाणी देऊन उन्हाळ्यात सुद्धा झाडं हिरवीगार ठेवून उल्लेखनीय काम केलं. पालवी फुटलेल्या झाडांसोबत आणखी झाडे लावत अक्षय तृतीया सण साजरा झाला. शुक्रवार १० मे रोजी रेल्वे वन विहार येथे मंडल रेल प्रबंधक नीरजकुमार दोहरे यांच्या हस्ते झाडांची पूजा करुन अक्षय तृतीया सण झाडांसोबत साजरा करण्यात आला. तेथील रहिवासी मोतेकर यांच्याकडून पाणी घेऊन प्रत्येक झाडाला देण्यात आले. 

अक्षय तृतीया निमित्त आंबा, नारळ, सिताफळ, बांबू आणि कारंज अशी नवी रोपटी लावण्यात आली. त्याचबरोबर पक्षांसाठी रुक्मिणी कदम यांनी जवळपास १०० जल-कुंडांचे दान केले. झाडांवर पाण्याची सोय केली. शिवाजी कदम तसेच नूतन वरिष्ठ मंडल संरक्षा‌ अधिकारी रामचंद्रन आणि इतर वरिष्ठांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी जितेंद्र. वाघमारे, शिवाजी कदम, रामचंद्रन, बी. आर. भगत, पर्यावरणप्रेमी प्रवीण तळे, संत निरंकारी मंडळाचे सदस्य अनिता पवार, संरक्षा विभागाची संपुर्ण टिम उपस्थित होती.

टॅग्स :Solapurसोलापूर