शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; नंदीध्वजांचं पावित्र्य जपण्यासाठी यंदा बाराबंदीधारकांची नवी आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:04 IST

रविवारी विशेष बैठक : तरुण पिढीला मार्गदर्शन करणार हिरेहब्बूंसह इतर मान्यवर

ठळक मुद्देयात्रेच्या आधी नंदीध्वज सरावावेळीही ही आचारसंहिता लागू असणार रविवार दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यात विशेष बैठक

रेवणसिद्ध जवळेकर । सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धारामेश्वरांच्या यात्रेतील नंदीध्वज मिरवणूक यात्रेतील पावित्र्य जपण्यासाठी मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी एक पाऊल पुढे टाकले असून, बाराबंदीधारकांसाठी नवी आचारसंहिता आणली आहे. यात्रेच्या आधी नंदीध्वज सरावावेळीही ही आचारसंहिता लागू असणार आहे.

या आचारसंहितेची माहिती मानाचे सातही नंदीध्वजांच्या मास्तरांसह बाराबंदी परिधान केलेल्या नंदीध्वजधाºयांना देण्यासाठी रविवार दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यात विशेष बैठक बोलाविण्यात आल्याचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

तैलाभिषेक सोहळ्यापासून यात्रेची मुख्य सुरुवात होते. त्यानंतर संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा, होम मैदानावर होम प्रदीपन आणि शोभेचे दारुकाम सोहळा पार पडतो. या चार सोहळ्यासाठी मानाचे सातही नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यापासून मिरवणुकीने पुढे मार्गस्थ होतात. मिरवणूक मार्गावर नंदीध्वजांचे पावित्र्य जोपासण्याचे काम काही जणांकडून होत नाही. हे पावित्र्य जोपासण्याबरोबर मिरवणुका वेळेत पोहोचविण्याची आपल्यावर जबाबदारी असून, ती जबाबदारी यंदा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रविवारी नंदीध्वजधारकांची खास बैठक बोलाविण्यात आल्याचे राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले. बहुतांश मंडळी बाराबंदी घालून मिरवणुकीत सहभागी होतात. बाराबंदी घालून जर कुणी चुकीचे कृत्य करीत असेल तर त्यांना तेथेच तंबी देऊन त्यांच्या अंगावरील बाराबंदी काढून घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

बैठकीत होणार व्यसनमुक्तीचा जागर- सराव अन् यात्रा सोहळ्यात नंदीध्वजांचे पावित्र्य राखण्याचे काम नंदीध्वजधारी करीत असतात; मात्र काही जणांकडून पावित्र्य राखले जात नसल्याच्या तक्रारी माझ्या कानावर येत असतात. किमान यात्रेच्या काळात तरी तंबाखू, गुटखा, मावा आदी व्यसनांना फाटा दिला पाहिजे. यासाठीच एक आचारसंहिता तयार केली जाणार असल्याचे हिरेहब्बू यांनी सांगितले. 

अक्षता सोहळा वेळेतच पार पाडू- ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळा हा प्रमुख सोहळा असतो. सोहळ्यासाठी सोलापूर शहरच नव्हे तर जिल्ह्यातील आणि लगतच्या कर्नाटक, आंध्रातील भाविक येत असतात. काही भाविक सकाळी ९ वाजल्यापासून संमती कट्टा परिसरात बसलेले असतात. ऊन आणि पाण्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याचा विचार करून यंदा अक्षता सोहळा अगदी वेळेत पार पाडण्यासाठी कटिबद्ध असल्याचे हिरेहब्बू यांनी सांगितले.

यात्रेतील पावित्र्य जपण्याचे काम तमाम श्री सिद्धरामेश्वर भक्तांचे आहे. हे पावित्र्य अधिक प्रभावीपणे जपण्यासाठीच आचारसंहिता करण्याची वेळ आली आहे. त्यानुसारच ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धारामेश्वरांच्या यात्रेतील प्रमुख सोहळे यशस्वीपणे पार पाडण्यात येतील.-राजशेखर हिरेहब्बूमानकरी- श्री सिद्धरामेश्वर यात्रा.

टॅग्स :Solapurसोलापूर