शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

मुलाखत ; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणाºया प्रदुषणाबाबत सोलापुरकरांनी सजग राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 16:28 IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणारे प्रदूषण आणि त्यावर न्यायालयाने घातलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत.

ठळक मुद्देप्रदूषण हे मानवनिर्मित असून, मानवाने आणलेले संकट आहे. ते रोखणेही मानवाच्याच हातातदेशात प्रदूषणाच्या बाबतीत वरच्या क्रमांकावर असलेल्या सोलापूरकरांनी तर याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे

बाळासाहेब बोचरे

सोलापूर: प्रदूषण हे मानवनिर्मित असून, मानवाने आणलेले संकट आहे. ते रोखणेही मानवाच्याच हातात आहे, अन्यथा हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे. देशात प्रदूषणाच्या बाबतीत वरच्या क्रमांकावर असलेल्या सोलापूरकरांनी तर याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपसंचालक नवनाथ अवताडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणारे प्रदूषण आणि त्यावर न्यायालयाने घातलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत.प्रश्न: उत्सव आणि उत्साह यातून होणाºया प्रदूषणाकडे आपण कसे पाहता? उत्तर: उत्सव म्हटले की उत्साह हा आलाच. अशावेळी आपण कोणतीच बंधने पाळत नाही. पण यातून निर्माण होणारे प्रदूषण उद्या आपल्यासाठीच जीवघेणे ठरणार आहे याची प्रत्येकाने जाण ठेवली पाहिजे. उत्सवात कर्णकर्कश आवाज, डीजेचा वापर तसेच मोठ्या आवाजाचे फटाके यामुळे बहिरेपणा, हृदयरोग, रक्तदाब, थकवा यांसारखे आजार उद्भवतात. शोभेच्या दारूपासून निर्माण होणाºया धुरापासून श्वसनाचे आजार होतात. फटाका अािण वाद्यांच्या वापरावर मर्यादा न राहिल्याने ध्वनी व वायू प्रदूषणात वाढ झाल्याने याला कुठेतरी निर्बंध घालण्याची गरज होती. म्हणून कायदे करण्यात आले. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. 

प्रश्न: सोलापूर प्रदूषणाच्या बाबतीत देशातील १० प्रमुख शहरांमध्ये आहे, त्याचे कारण काय? उत्तर: याला एक कारण नाही, अनेक कारणे आहेत. सोलापूरची भौगोलिक परिस्थिती कोरडे हवामान, पीकपरिस्थिती आणि रस्त्यावर कचरा टाकण्याची जनतेची मानसिकता ही काही कारणे त्यास कारणीभूत आहेत. यावर उपाय म्हणून प्रदूषण मंडळाने कृती आराखडा तयार केला असून, तो शासनाकडे पाठविला आहे. 

प्रश्न: जलप्रदूषणाबाबत काय उपाययोजना केल्या आहेत?उत्तर: जिल्ह्यातून वाहणाºया भीमा नदीच्या प्रदूषणाचा विषय ऐरणीवर असून, या नदीचे प्रदूषण उद्भवापासूनच होते. त्यामुळे नमामि चंद्रभागा मोहिमेंतर्गत राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. सोलापूर शहरातील जलप्रदूषण रोखणे हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना मनपाला दिल्या असून, आजमितीला मनपाकडून तीन प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. त्या माध्यमातून दररोज १०२.५ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. 

प्रश्न : प्लास्टिक बंदीमुळे प्रदूषण नियंत्रणात आले काय? उत्तर: होय! प्लास्टिकपासून निर्माण होणारे प्रदूषण जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले असून, यावर घातलेल्या बंदीचे जनतेमधून स्वागत केले जात आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरenvironmentवातावरणDivaliदिवाळी