शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

सोलापूरच्या वीज कर्मचाºयांचा कोकणात संघर्ष; भरपावसातही सेवा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:51 IST

चक्रीवादळ : दोन अभियंत्यांसह १२ जनमित्रांचा समावेश, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू

ठळक मुद्देकोकणात चक्रीवादळामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहेकोकणातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू सोलापुरातील बार्शी व सोलापूर शहरातील अभियंते, जनमित्र कोकणात सेवा देत आहेत

सोलापूर : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या वीज यंत्रणेची पुन्हा उभारणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे १४ अभियंते व कर्मचारी संततधार पावसात कोकणातील दापोली परिसरात (जि. रत्नागिरी) युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करीत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या सोलापूर शहर व ग्रामीण तसेच बार्शी विभागातील दोन अभियंता व १२ जनमित्र दापोली तालुक्यातील हर्णे येथे वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहे. समुद्रकिनारी असलेल्या या गावातील सुमारे ९५ टक्के वीज यंत्रणा चक्रीवादळाने जमीनदोस्त झाली आहे. कोरोनामुळे बाहेर जिल्ह्यातील मजूर उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांच्या मदतीने वीज यंत्रणा उभारण्याचे काम सुरु आहे. यामध्ये नवीन वीज खांब रोवणे, वीज तारा ओढणे, खड्डे करण्यापासून वीज खांबांची खांद्यावरून वाहतूक करण्यापर्यंत सर्व कामे महावितरणचे कर्मचारी करीत आहेत.

या दुरुस्ती कामादरम्यान संततधार पाऊस हजेरी देत असल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत वीज यंत्रणेची कामे करावी लागत आहेत. मात्र चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न अभियंते व कर्मचाºयांकडून सुरु आहेत. या पथकांमध्ये सहायक अभियंता दाऊद तगारे (सोलापूर), कनिष्ठ अभियंता रमेश लोकरे (बार्शी) तसेच गोपाळ बार्शीकर, प्रमोद जगदाळे, पिराजी माने, आरिफ शेख, सचिन कानडे, बिलाल चाऊस, बजरंग अवताडे, शरणप्पा दड्डे, राजेंद्र बोधले (सर्व सोलापूर), श्रीपती आवटे, संदीप देठे, अमोल पाटील (सर्व बार्शी) यांचा समावेश आहे. 

गेल्या ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळाचा कोकणच्या किनारपट्टीला मोठा तडाखा बसला. प्रामुख्याने रायगड व रत्नागिरीसह इतर काही जिल्ह्यांतील वीज यंत्रणेची मोठ्या प्रमाणात हानी झाली. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ७८०० वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी इतर जिल्ह्यातून महावितरणचे अभियंते व कर्मचाºयांचे पथके पाठविण्याचे निर्देश दिले होते.

कोकणात चक्रीवादळामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे़ कोकणातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सोलापुरातील बार्शी व सोलापूर शहरातील अभियंते, जनमित्र कोकणात सेवा देत आहेत. भर पावसातही विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम अहोरात्र सुरूच आहे़- ज्ञानदेव पडळकर,अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणRainपाऊसCyclone Amphanअम्फान चक्रीवादळ