शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

solapur politics : मंद्रुपच्या राजकारणाने सहकारमंत्र्यांच्या वाटेत काटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 15:18 IST

नारायण चव्हाण  सोलापूर : मंद्रुपच्या राजकारणामुळे भाजपाच्या सुभाष देशमुख यांना सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात लढण्याचे बळ मिळाले़ त्याच मंद्रुपमधून ...

ठळक मुद्देमंद्रुपमधून आता सहकार मंत्र्यांच्या वाटेत काटे पेरले जात आहेतकाँग्रेस आणि भाजपामध्ये होणारी विधानसभा निवडणूक आता चौरंगी होण्याची शक्यता पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा नवा अध्याय या मतदारसंघात पुढे येण्याची शक्यता

नारायण चव्हाण 

सोलापूर : मंद्रुपच्या राजकारणामुळे भाजपाच्या सुभाष देशमुख यांना सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात लढण्याचे बळ मिळाले़ त्याच मंद्रुपमधून आता सहकार मंत्र्यांच्या वाटेत काटे पेरले जात आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपामध्ये होणारी विधानसभा निवडणूक आता चौरंगी होण्याची शक्यता अधिक आहे. त्याचबरोबर पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा नवा अध्याय या मतदारसंघात पुढे येण्याची शक्यता आहे.

सन २०१३ मध्ये असंतुष्ट काँग्रेस नेत्यांनी देशमुखांना मतदारसंघात लढण्याचे अप्रत्यक्ष निमंत्रण दिले; पण गोपाळराव कोरे यांनी चहा - पानाच्या निमित्ताने आपल्या घरी आमंत्रित करून गळ घातल्यानंतर मात्र त्या देशमुखांनी डोळे विस्फारले अन् ‘दक्षिण’मध्ये लढण्याचा विचार सुरू केला. याच काळात भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यामुळे सुभाष देशमुख यांच्या उमेदवारीचा मार्गही मोकळा झाला. देशमुखांनी नंतर विजय संपादन केला; पण एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे मंद्रुपचे गोपाळराव कोरे आणि गुरुसिद्ध म्हेत्रे यांनी स्थानिक राजकारणातून आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला. आपल्या अस्तित्वासाठी त्यांनी सुभाष देशमुख यांच्यापासून फारकत घेत ग्रामपंचायतीची तयारी सुरू केली. 

दरम्यान देशमुखांनीही स्वतंत्र फळी निर्माण केली़ तिरंगी लढतीत मंद्रुप ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आली आणि तिथूनच सुभाष देशमुख व आप्पाराव कोरे यांच्यातील शीतयुद्धाचा प्रारंभ झाला. ऊस तोडणी मजुरांच्या नावाने लोकमंगल कारखान्याचे कर्ज प्रकरण, लोकमंगल मल्टिस्टेटचे दूध भुकटी अनुदान प्रकरण आप्पाराव कोरे यांनी लावून धरले. 

या दोन्ही प्रकरणात सहकारमंत्री सुभाष देशमुख चांगलेच अडचणीत आले आहेत. ज्या मंद्रुपमुळे त्यांना राजकीय स्पेस साधता आली त्याच मंद्रुपमधून आता त्यांना कडवा विरोध होत आहे. या प्रकरणामुळे प्रकाशझोतात आलेले आप्पाराव कोरे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता अधिक आहे.

नुकत्याच झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी सहकार मंत्री गटाचा पाडाव केला. त्यामुळे साहजिकच माने यांचे मनोबल वाढले आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीत सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने यांच्यातच रंगतदार सामना होणार हेही स्पष्ट आहे. गतवेळच्या निवडणुकीतील सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत तडजोडीची भूमिका स्वीकारल्याने ते काँग्रेससोबतच राहणार, असे तूर्तास गृहीत धरायला हरकत नाही. सेनेचे अमर पाटील यांचीही निवडणूक तयारी सुरू असली तरी सेना -  भाजपा युती झाल्यास त्यांची भूमिका कशी राहील हे त्याचवेळी स्पष्ट होईल.

राष्ट्रीय बाजारचे मळभ दूर- बाजार समितीच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे गेल्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मतदारसंघातील संपर्क वाढवला . विकासकामांचा सपाटा सुरू केला . त्याचबरोबर विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय बाजारचे विधेयक विधिमंडळात सादर केले. विधेयक मंजूर झाले असते तर बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त झाले असते . एका दगडात अनेक पक्षी मारण्याची देशमुखांची योजना विधेयक मागे घेतल्याने बारगळली . त्याचबरोबर देशमुख विरोधकांवर निर्माण झालेले बरखास्तीचे मळभ दूर झाले . विधानसभा निवडणुकीत ही मंडळी पुन्हा एकत्र राहणार, की वेगळी चूल मांडणार हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणSubhash Deshmukhसुभाष देशमुख