शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर: आतापासूनच बेरजेचे राजकारण सुरू, उमेदवारी देताना रुसवे फुगवे वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:44 IST

स्थानिक गटातटात होणार निवडणुका : आदिनाथच्या निवडणुकीनंतर समीकरण बदलले

करमाळा: गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घ्या, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीसाठी करमाळा तालुक्यात आतापासूनच बेरजेचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

करमाळा तालुक्यात आमदार नारायण पाटील यांची पंचायत समितीवर निर्विवाद सत्ता होती. नारायण पाटील यांच्याकडे दहापैकी सात तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याकडे सदस्य व बागल गटाकडे दोन सदस्य होते. करमाळा नगरपालिकेवर गेल्या चार टर्मपासून जयवंतराव जगताप यांच्याकडे सत्ता असून गतपंचवार्षिक निवडणुकीत जगताप गटाने बागल गटाशी युती करून निवडणुका जिंकल्या होत्या. नगराध्यक्षांच्या थेट निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव वैभवराजे जगताप नगराध्यक्ष म्हणून विजयी झालेले होते; परंतु निवडणुका झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच जगताप व बागल यांची युती तुटली व विरोधात निवडणूक लढवलेल्या सावंत गटाने जगताप गटाबरोबर दोस्ताना करून संपूर्ण पाच वर्षे सत्तेत सहभाग नोंदवला, तर सत्तास्थानी असलेल्या बागल गटाला विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी लागली. नागरिक संघटना विरोधात होती.

करमाळा मतदारसंघात आमदार नारायण पाटील यांच्यासोबत असलेले माजी आमदार जयवंतराव जगताप व सावंत गट यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीसह नगरपालिका निवडणुकीसाठी जळवाजळवा सुरू केलेली आहे. पंचायत समिती व नगरपालिकेवर आपल्या गटाचा झेंडा फडकवण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे. विधानसभा निवडणूक व आदिनाथ कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान नेत्यांनी अनेकांना शब्द दिला आहे. त्यामुळे अनेकांचे रुसवे फुगवे उमेदवारी देताना काढावे लागणार आहेत.

इच्छुकांची गर्दी..

पांडे जि.प. गटातून दादा जाधव, संतोष पाटील, संतोष वारे, वीट गटातून पंचायत समिती रावगाव सुजीत बागल, किरण फुंदे, युवराज कपाट पांडेकर, विनय ननावरे, शीतल क्षीरसागर, पोत्रे, सुनील सावंत, राहुल सावंत, संतोष वारे, देवानंद बागल, डॉ. अमोल घाडगे, चिकलठाण गटातून विकास गलांडे, चंद्रकांत सरडे जेऊर गणातून अतुल पाटील, पृथ्वीराज पाटील, अतुल मस्कर, सतीश नीळ, कोर्टी गटातून सविता राजेभोसले, सुभाष गुळवे इच्छुक आहेत.

करमाळा नगरपालिकेत पूर्वी १७ प्रभाग होते या निवडणुकीत २० प्रभाग केले आहेत. जिल्हा परिषदेत पूर्वी पाच गट होते. आता नव्याने चिकलठाण हा नवीन गट वाढल्याने जिल्हा परिषदेचे सहा गट झाले आहेत. पंचायत समितीत १० गण होते. आता नव्याने पंचायत समितीमध्ये दोन गण वाढल्याने १२ गण झाले आहेत. पंचायत समितीमध्ये झाले आहेत.

संजयमामा शिंदे, बागल गटाची भूमिका महत्त्वाची..

विधानसभा व आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटलांना जयवंतराव जगताप व सावंत गट यांनी पाठिंबा दिलेला होता, तर आदिनाथ कारखान्यामध्ये बागल गटाने नारायण पाटलांना छुपा पाठिंबा दिलेला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बागल कोणती भूमिका घेणार यावर बरेच काही अवलंबून आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांची 'एकला चलो रे'ची भूमिका कायम असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी संजयमामा शिंदे यांनी चालवलेली आहे. प्रा. रामदास झोळ गट निवडणूक रिंगणात उतरण्याची भाषा बोलू लागला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSolapurसोलापूर