शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सोलापूर: आतापासूनच बेरजेचे राजकारण सुरू, उमेदवारी देताना रुसवे फुगवे वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:44 IST

स्थानिक गटातटात होणार निवडणुका : आदिनाथच्या निवडणुकीनंतर समीकरण बदलले

करमाळा: गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घ्या, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीसाठी करमाळा तालुक्यात आतापासूनच बेरजेचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

करमाळा तालुक्यात आमदार नारायण पाटील यांची पंचायत समितीवर निर्विवाद सत्ता होती. नारायण पाटील यांच्याकडे दहापैकी सात तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याकडे सदस्य व बागल गटाकडे दोन सदस्य होते. करमाळा नगरपालिकेवर गेल्या चार टर्मपासून जयवंतराव जगताप यांच्याकडे सत्ता असून गतपंचवार्षिक निवडणुकीत जगताप गटाने बागल गटाशी युती करून निवडणुका जिंकल्या होत्या. नगराध्यक्षांच्या थेट निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव वैभवराजे जगताप नगराध्यक्ष म्हणून विजयी झालेले होते; परंतु निवडणुका झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच जगताप व बागल यांची युती तुटली व विरोधात निवडणूक लढवलेल्या सावंत गटाने जगताप गटाबरोबर दोस्ताना करून संपूर्ण पाच वर्षे सत्तेत सहभाग नोंदवला, तर सत्तास्थानी असलेल्या बागल गटाला विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी लागली. नागरिक संघटना विरोधात होती.

करमाळा मतदारसंघात आमदार नारायण पाटील यांच्यासोबत असलेले माजी आमदार जयवंतराव जगताप व सावंत गट यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीसह नगरपालिका निवडणुकीसाठी जळवाजळवा सुरू केलेली आहे. पंचायत समिती व नगरपालिकेवर आपल्या गटाचा झेंडा फडकवण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे. विधानसभा निवडणूक व आदिनाथ कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान नेत्यांनी अनेकांना शब्द दिला आहे. त्यामुळे अनेकांचे रुसवे फुगवे उमेदवारी देताना काढावे लागणार आहेत.

इच्छुकांची गर्दी..

पांडे जि.प. गटातून दादा जाधव, संतोष पाटील, संतोष वारे, वीट गटातून पंचायत समिती रावगाव सुजीत बागल, किरण फुंदे, युवराज कपाट पांडेकर, विनय ननावरे, शीतल क्षीरसागर, पोत्रे, सुनील सावंत, राहुल सावंत, संतोष वारे, देवानंद बागल, डॉ. अमोल घाडगे, चिकलठाण गटातून विकास गलांडे, चंद्रकांत सरडे जेऊर गणातून अतुल पाटील, पृथ्वीराज पाटील, अतुल मस्कर, सतीश नीळ, कोर्टी गटातून सविता राजेभोसले, सुभाष गुळवे इच्छुक आहेत.

करमाळा नगरपालिकेत पूर्वी १७ प्रभाग होते या निवडणुकीत २० प्रभाग केले आहेत. जिल्हा परिषदेत पूर्वी पाच गट होते. आता नव्याने चिकलठाण हा नवीन गट वाढल्याने जिल्हा परिषदेचे सहा गट झाले आहेत. पंचायत समितीत १० गण होते. आता नव्याने पंचायत समितीमध्ये दोन गण वाढल्याने १२ गण झाले आहेत. पंचायत समितीमध्ये झाले आहेत.

संजयमामा शिंदे, बागल गटाची भूमिका महत्त्वाची..

विधानसभा व आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटलांना जयवंतराव जगताप व सावंत गट यांनी पाठिंबा दिलेला होता, तर आदिनाथ कारखान्यामध्ये बागल गटाने नारायण पाटलांना छुपा पाठिंबा दिलेला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बागल कोणती भूमिका घेणार यावर बरेच काही अवलंबून आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांची 'एकला चलो रे'ची भूमिका कायम असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी संजयमामा शिंदे यांनी चालवलेली आहे. प्रा. रामदास झोळ गट निवडणूक रिंगणात उतरण्याची भाषा बोलू लागला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSolapurसोलापूर