शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Solapur Politics; सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन देशमुखांतील सुंदोपसुंदी कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 14:00 IST

राकेश कदम  सोलापूर : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजपातील दोन गटांत सुंदोपसुंदी कायम आहे. दोन दिवसांपूर्वी शहर उत्तरमधील ...

ठळक मुद्देगट-तटाचे राजकारण : पक्षाच्या कार्यक्रमात एकमेकांना डावलण्यावर भरलोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजपातील दोन गटांत सुंदोपसुंदी कायम सहकारमंत्री गटाने पालकमंत्र्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले

राकेश कदम सोलापूर : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजपातील दोन गटांत सुंदोपसुंदी कायम आहे. दोन दिवसांपूर्वी शहर उत्तरमधील शक्ती प्रमुखांच्या संमेलनात सहकारमंत्री गटाला टाळण्यात आले होते. तर रविवारी सोशल मीडियावरील ‘नमो अगेन’ या कार्यशाळेत पालकमंत्री गटाला डावलण्यात आल्याचे दिसून आले. 

भाजपच्या सोलापूरलोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी रविवारी सोशल मीडियासंदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत भाजपाच्या महाराष्ट्र राज्य आयटी सेलचे प्रमुख आशिष मेरखेड यांनी मार्गदर्शन केले. खासदार अमर साबळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहर अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, महापौर शोभा बनशेट्टी, हेमंत पिंगळे, रामचंद्र जन्नू यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर पालकमंत्री गटाचा एकही नेता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. यासंदर्भात पालकमंत्री गटातील नगरसेवकांना विचारल्यानंतर त्यांनी कोण कुठे कार्यक्रम घेतोय. आमच्या पक्षाचं काय चाललंय कळत नाही, अशा प्रतिक्रिया दिल्या. या कार्यशाळेत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षासाठी नेमकं काय काय करता येईल, याबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

दोन दिवसांपूर्वी शिवदारे मंगल कार्यालयात शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि त्यांच्या गटाचे नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. पण या कार्यक्रमात भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, महापौर शोभा बनशेट्टी यांना बोलावण्यात आलेले नव्हते. आमच्या मतदारसंघात कार्यक्रम घेऊनही आम्हाला निमंत्रण दिले जात नाही, याबद्दल तक्रार करणार असल्याचे महापौर बनशेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शक्ती प्रमुखांच्या संमेलनाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख अनुपस्थित होते. कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते तर जायचे कसे, असा सवाल पालकमंत्री गटाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला होता. पण ही निमंत्रणे निवडणूक वॉर रूममधून दिली जात असल्याचे सांगून सहकारमंत्री गटाने पालकमंत्र्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कुठे आणि कोणती कार्यशाळा झाली, याबद्दल मला माहिती नाही. आम्ही तर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. - संजय कोळी, पक्षनेता. 

कोणत्या कार्यक्रमांना कोणाला बोलवायचे हे ठरलेले आहे. प्रदेशाच्या निर्णयाप्रमाणे लोकांना निमंत्रणे दिली जात आहेत. सोशल मीडियासंदर्भातील कार्यशाळा ही कार्यकर्त्यांसाठी होती. त्यामुळे यात निमंत्रणाचा मुद्दा गौण ठरतो. - प्रा. अशोक निंबर्गी, शहराध्यक्ष, भाजपा. 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण