शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला मिळतेय गती; उत्तर तालुक्यातील गावांची मोजणी सुरू

By appasaheb.patil | Updated: August 24, 2022 15:27 IST

सेवालालनगर, भोगाव, देगाव, बाळे, मार्डीतील शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळणार

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : बहुचर्चित सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या ८४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या कामास आता हळूहळू मोठी गती मिळत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीची अंतिम मोजणी भूसंपादन विभाग व रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. मोजणीनंतर शेतकऱ्यांना बाधित जागेचे पैसे लवकरच देणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने कळविण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण भारत अशा तीन शहरांना जोडला जाणारा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून सोलापूर -उस्मानाबाद मार्ग ओळखला जाणार आहे. मार्गातील लाईन मार्कींगचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले. रेल्वे विभागातील अधिकारी आणि भूमी अभिलेख कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोजणीचे काम सुरू असून त्यासाठी बाधित जमिनीच्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष मोजणीच्या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन रेल्वेचे आणि भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी केले आहे.

---------

या गावात होतेय मोजणी

  • - सेवालालनगर
  • - भोगाव
  • - देगाव
  • - मार्डी
  • - बाळे

---------

वर्षभरात होईल प्रत्यक्ष कामाला सुरुवात

भूसंपादनासाठीची मुख्य प्रक्रिया सुरू झाली आहे. संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत. कोणाचीही हरकत नसेल तर भूसंपादन लवकर होईल, त्यानंतर मुख्य कामासाठी पुन्हा रेल्वे मंत्रालयाकडे आराखडा तयार करून निधीची मागणी होईल, निधी मंजूर झाल्यानंतर रेल्वे मार्गाचे काम सुरू हाेईल, काम सुरू झाल्यानंतर साधारण- एक ते दीड वर्षाच्या आत हा मार्ग तयार होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

--------

रेल्वे अन् भूसंपादन अधिकाऱ्यांची टीम

उत्तर सोलापूर तालुक्यातील पाच गावातील रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे मोजणीचे काम सुरू आहे. हे काम भूसंपादन कार्यालय व रेल्वे विभागाच्या उपस्थितीत होत आहे. मोजणीसाठी शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. यासाठी रेल्वेचे पाच ते सात अधिकारी व भूसंपादन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत.

--------

शेतकरी आनंदी अन् प्रतीक्षेतही

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा रेल्वे मार्ग आपल्या शेतातून जाणार व आपल्याला योग्य तो मोबदला मिळणार या आशेने उत्तर सोलापूर तालुक्यातील पाचही गावातील शेतकरी आनंदी आहेत. शिवाय भूसंपादनाचे पैसे कधी मिळणार व रेल्वे कधी धावणार याबाबतचीही उत्सुकता शेतकऱ्यांना लागून राहिली असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेOsmanabadउस्मानाबाद