शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

सोलापुरात दिवसाला केवळ २८०० नागरिकांच्या हातात शिवभोजनाची थाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 16:48 IST

हजारो नागरिकांवर उपाशीची पाळी, केंद्र आणि थाळींची संख्या वाढली पाहिजे

सोलापूर : तमिळनाडूमध्ये अम्मा कॅन्टीन लोकप्रिय आहे. भरपेट आणि स्वादिष्ट भोजन कॅन्टीनमधून मिळते, तेही अत्यल्प दरात. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने शिवभोजन थाळी ही योजना अमलात आणली. लॉकडाऊनमुळे शिवभोजन थाळी अगदी मोफत करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात रोज २,८०० नागरिकांच्या हातात शिवभोजनाची थाळी मिळते. प्रत्यक्षात याहून दहा पटीने अधिक शिवभोजन थाळीला मागणी आहे.

लॉकडॉऊनमुळे अनेकांची रोजीरोटी बुडाली. रोजगार बुडाला असला तरी सर्वसामान्य नागरिकांची ‘रोटी’ ची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे त्यांच्या भाषणात सांगितले. सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४३ लाख इतकी आहे. श्रमिक कामगारांची संख्या १० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या जिल्ह्यात फक्त रोज तीन २,८०० लोकांनाच मोफत जेवण मिळते, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे, असे श्रमिक कामगार संघटनांचे प्रतिनिधी म्हणताहेत. .............

जिल्ह्यात शिवभोजन केंद्र 

३३ 

 

दररोज लाभ - २,८०० थाळी

स्वादिष्ट मेनू

सोलापूर शहर परिसरात एकूण पाच ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू आहे. या पाच केंद्रांवर फक्त ८२५ थाळी वितरित होतात. त्यासोबत ग्रामीण भागात २८ ठिकाणी शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. या २८ ठिकाणी दररोज १,८०० ते २ हजार थाळी वितरित होतात. भाजी, दोन पोळी. वाटीभर भात, आमटी असा मेनू मिळतो. पूर्वी प्रति थाळी पाच रुपये आकारले जायचे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार थाळी मोफत दिली जात आहे.

या लॉकडाऊन काळात कारखाने बंद आहेत. त्यामुळे खाण्याचे वांदे होत आहेत. अशा काळात शिवभोजन थाळी केंद्राचा आधार वाटतो. एखाद्या दिवशी उशीर झाल्यास केंद्र बंद होऊन जाते. त्या दिवशी उपाशी राहावे लागते.

तुळशीदास माने

अवघ्या तासाभरात शिवभोजन केंद्र बंद पडते. त्यानंतर आलेल्या नागरिकांची पंचाईत होते. भोजन मिळत नाही. थाळींची संख्या वाढवा.

- असलम पठाण

सोलापूर जिल्हा खूप मोठा आहे. प्रत्येक गावात शिवभोजन केंद्र असावे. केंद्रांची संख्या वाढली पाहिजे. अन्यथा उपाशी राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल.

- जावेद अली

 

टॅग्स :Solapurसोलापूरshiv bhojnalayaशिवभोजनालयcorona virusकोरोना वायरस बातम्या