शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

सोलापूर बाजार समितीत ३ एप्रिलपासून कांदा अनुदानासाठी अर्ज स्वीकारणार!

By विठ्ठल खेळगी | Updated: April 2, 2023 12:50 IST

राज्यातील सरकारी व खाजगी बाजार समितीत १ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना २०० क्विंटलपर्यंत प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान राज्य शासनाकडून मिळणार आहे.

सोलापूर : कांद्याचा दर अचानकपणे कोसळल्यामुळे राज्य शासनाने प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सोलापूर बाजार समितीत दि. ३ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे, अशी माहिती उपसभापती श्रीशैल नरोळे यांनी दिली.

राज्यातील सरकारी व खाजगी बाजार समितीत १ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना २०० क्विंटलपर्यंत प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान राज्य शासनाकडून मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक बाजार समितीकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. बाजार समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून जिल्हा उपनिबंधकांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. जिल्हा उपनिबंधक मार्फत राज्य शासनाकडे अनुदानासाठी अहवाल देण्यात येणार आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोमवार, दि. ३ एप्रिलपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होत आहे. त्यासाठी बाजार समितीच्यावतीने स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. दि. २० एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. मुदत संपल्यावर दाखल होणाऱ्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही. कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर कांद्याची नोंद असणे आवश्यक आहे. त्यासोबत आधार कार्ड बाजार समितीतील कांदापट्टी देणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले. 

टॅग्स :Solapurसोलापूरonlineऑनलाइन